शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

यशोदा नदी खोलीकरणामुळे शेताकडे जाणारे रस्ते झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे नदी पलीकडे शेती असणाऱ्या दिघी (बोपापूर) येथील शेतकऱ्यांसह मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. नदीच्या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी रहात असल्याने पलीकडे जावून शेती कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढण्याकरिता नदीवर कोल्हापुरी बंधारा निर्माण करून गावकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देशेती पडीक राहण्याची वेळ : नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे नदी पलीकडे शेती असणाऱ्या दिघी (बोपापूर) येथील शेतकऱ्यांसह मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. नदीच्या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी रहात असल्याने पलीकडे जावून शेती कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढण्याकरिता नदीवर कोल्हापुरी बंधारा निर्माण करून गावकऱ्यांच्या रस्त्याची समस्या मार्गी काढावी अशी मागणी सरपंच घनश्याम कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.दिघी (बोपापूर) येथील यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे पात्रातील भूभाग खोल गेल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी राहत असल्याने नदी ओलांडून पलीकडे जाणे जीवावर बेतणारे ठरले आहे. त्यामुळे नदीपलीकडे असणारी शेती कशी करावी या विवंचनेत या भागातील शेतकरी आहेत.खोलीकरणामुळे शेताकडे जाणारे पूर्ण रस्ते बंद झाले आहे. गावाला लागून बजाज फाऊंडेशनच्यावतीने नदीच्या पात्रात मातीकाम करून तात्पुरती रस्ता केला आहे. परंतु हा रस्ता सुद्धा वाहून गेल्याने पात्रात दलदल निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांना शेती करावयाची असल्यास जवळच असलेल्या नदीच्या पुलावरून आठ किमी जाणे व येणे असा १६ किमीचा फेरा पडत आहे. नदी खोलीकरणामुळे शेतीला पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याठिकाणी कोल्हापुरी बंधारा बाधून जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :riverनदीDeoliदेवळी