शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

विविधतेत एकतेमुळेच भारतीय लोकशाही मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:02 IST

भारतात विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ असतानाही भारत देश एकसंघ आहे. संविधानाने आपल्या देशातील विविधतेला एकतेत परावर्तीत केले आहे. जगातील अनेक देशात विघटन झाले; पण भारतात अनेक भेद असतानाही हा देश संविधानामुळे टिकून आहे, असे विचार लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंजय आवटे : बापुराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतात विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ असतानाही भारत देश एकसंघ आहे. संविधानाने आपल्या देशातील विविधतेला एकतेत परावर्तीत केले आहे. जगातील अनेक देशात विघटन झाले; पण भारतात अनेक भेद असतानाही हा देश संविधानामुळे टिकून आहे, असे विचार लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केले.सहकार महर्षी स्व.बापुराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख होते तर उपाध्यक्ष सतीश राऊत, सचिव प्रकाश ढांगे, संचालक डॉ. किशोर अहेर, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.आवटे पुढे म्हणाले, भारतीय संविधान भारताच्या लोकांनी स्वत:ला अर्पण केले आहे. इतर देशात लोकांना मतदानाचा हक्क मागावा लागल. मात्र, आपल्या देशात अगदी सुरूवातीपासून मतदानाचा हक्क मिळाला. सर्वसामान्य व्यक्ती हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. शिवाय त्याचा विविधता सर्वसमावेशकता या जीवनमुल्यावर विश्वास आहे. नेहरू, गांधी, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीने लोकशाही अधिक प्रगल्भ झाली आहे. विविधतेने नटलेल्या या देशात आम्ही भारताचे लोक सौख्याने नांदत आहे. हेच लोकशाहीचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंतची वाटचाल तरूणांना समजावून सांगणे गरजेचे असल्याचेही सरतेशेवटी त्यांनी सांगितले.प्रा. सुरेश देशमुख यांनी स्व. दाआजींच्या कतृर्त्वावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागात शिक्षणाची पायमुळे रूजवून आज ग्रामीण जीवन उंचावण्याचे महत्वाचे कार्य दाआजींनी केल्याचे ते म्हणाले. वर्धा जिल्ह्यात सर्व सत्तास्थाने काबीज करून काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत केल्याचे ते त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व अतिथीचा परिचय प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी करून दिला.स्व. बापुरावजी देशमुख महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होळपळत असताना शासनाला ३२५ कोटींची मदत करून दिल्याचा उजाळा करून दिला.ग्रामीण भागात जोपर्यंत शिक्षणाचे व्दार उघडल्या जाणार नाही. तोपर्यंत विकास साध्य होणार नाही, हा दृष्टीकोन जोपासुन त्यांनी जिल्ह्यातील खेड्यागावात शाळा सुरू केल्याचे देशमुख म्हणाले. संचालन प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सतीश राऊत यांनी मानले.