शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतिफीमुळे 'धाम' अमृतवाहिनी होण्याचा 'सूक्ष्म आराखडा' अपूर्ण !

By महेश सायखेडे | Updated: May 31, 2023 11:46 IST

अधिकारी गंभीर नाहीच : धाम नदी करते वर्धासह परिसरातील १३ गावांची तृष्णातृप्ती

महेश सायखेडे

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील तीन नदींसह राज्यातील १०७ नदी अमृतवाहिनी व्हाव्यात या हेतूने चला जाणूया नदीला हे अभियान शासनाने हाती घेतले आहे. या अभियानाचा श्रीगणेशा राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातून झाला. या अभियानात जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील तेरा गावांची तृष्णातृप्ती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या धाम नदीचा समावेश आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातीलच यशोदा आणि वणा नदीचाही समावेश करण्यात आला आहे. धाम नदीची संवाद यात्रा नुकतीच पूर्ण झाली; पण तब्बल २५ विभागांच्या अधिकाऱ्यांच्या लेटलतिफीमुळे 'धाम' नदी अमृतवाहिनी होण्याचा 'सूक्ष्म आराखडा' सध्या अपूर्ण आहे.

वर्धा तालुक्यातील पवनार येथे धाम नदीच्या तीरावर आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम असून या नदीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील ही नदी प्रामुख्याने अमृतवाहिनी व्हावी अशी अपेक्षा अनेकांना आहे; पण संबंधित २५ विभागांचे अधिकारी दुर्लक्षित धोरण राबविण्यात धन्यता मानत असल्याने जिल्हा प्रशासनानेही कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दीड महिन्यात झाली धामची संवाद यात्रा पूर्ण

धाम नदी संवाद यात्रेला कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून २० मार्चला सुरूवात झाली. धाम नदीच्या काठावरील तब्बल ४५ गावांत ही यात्रा जात सुमारे दीड लाख नागरिकांना प्रदूषणमुक्त धाम नदीचे महत्त्व पटवून देण्यात आले. या संवाद यात्रेचा समारोप ३ मे रोजी समुद्रपूर तालुक्यातील सुजातपूर येथे झाला असला तरी अद्यापही आवश्यक माहिती संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नदी प्रहरीला दिली नसल्याने धाम अमृतवाहिनी होण्याचा सूक्ष्म आराखडाच तयार झालेला नाही.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रांनाही पाठ

संबंधित २५ विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली धाम नदीबाबतची आवश्यक माहिती नदी प्रहरीला द्यावी. शिवाय तातडीने सूक्ष्म आराखडा तयार करीत तो शासनाला सादर करता येईल यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा आशयाचे पत्र या २५ विभागांच्या अधिकाऱ्यांना खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला संबंधित अधिकारी केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानत आहेत.

धाम नदी प्रहरी म्हणून दोन तज्ज्ञ सांभाळताहेत जबाबदारी

ज्येष्ठ वृक्षमित्र तथा निसर्ग प्रेमी मुरलीधर बेलखोडे आणि जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांच्याकडे धाम नदीची प्रहरी म्हणून जबाबदारी आहे; पण त्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

धाम नदी समन्वयक म्हणून बरीच मदत आम्हाला मिळाली आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर निम्म्याहून अधिक माहिती प्राप्त झाली आहे. लवकरच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना धाम नदी अमृतवाहिनी होण्याचा सूक्ष्म आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू.

- मुरलीधर बेलखोडे, प्रहरी, धाम नदी.

टॅग्स :Socialसामाजिकwardha-acवर्धा