शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट

By admin | Updated: June 21, 2017 00:41 IST

हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली.

१,५१७ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात : पाऊस बेपत्ता; जमिनीला भेगा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली. पेरणी केल्यावर एक पाऊस आला. यामुळे जमिनीत पेरलेले बियाणे अंकुरले; मात्र यानंतर पाऊस बेपत्ता झाला असून बियाण्यांचे अंकूर करपणे सुरू झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ५१७ हेक्टरवरील पेरण्या धोक्यात आल्या असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी आलेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा बळावल्याने त्यांनी कपाशीची लागवड केली. अशातच हवामान खात्याने ११ जून रोजी मान्सून धडकणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेण्याच्या आशेपोटी कपाशीची लागवड केली. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे टाकलेले बियाणे अंकुरले. बियाण्यांच्या अंकुराला पावसाची गरज असताना पाऊस बेपत्ता झाला. परिणामी अंकुर करपत आहेत. पाऊस आला नसल्याने जमिनीत टाकलेले काही बियाणे दबल्या गेले आहे. शेतातील निम्मे पिक करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तर ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिकलरच्या सहायाने पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे व सततच्या भारनियमनामुळे तेही करणे अडचणीचे ठरत आहे. जर या दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती जिल्ह्यात आज निर्माण झाली आहे.