शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कालव्याच्या माती भराव्यामुळे शेतात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:09 IST

नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे.

ठळक मुद्दे३ ते ४ वर्षापासून काम रखडले : शेतकऱ्यांचे ६० हजार रूपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जामणीच्या शिवारातून गेलेला निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा पद्माकर अतकरे यांच्या शेतातून गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ताही तयार करण्यात आला असून या पांदण रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याकरिता चार वर्षापूर्वी सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. परंतु ते पाईप कालव्याच्या मातीनी पूर्णत: बुजून गेल्याने अतकरे यांच्या शेतातील पाणी अडले आहे. हे पाणी शेतातच साचून राहिल्याने शेतातील दोन एकरातील शेंगा भरलेले सोयाबीन पाण्याने सडून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास ६० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याकरिता संबंधित विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.सदर शेतकऱ्याने अर्ली व्हेरायटीचे ९३०५ सिद्ध कंपनी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी सुरूवातीलाच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात केल्यामुळे पेरणी उत्तमरित्या साधली होती. यामुळे सोयाबीन झाडाला शेंगा सुद्धा भरघोष आल्या आहे. शेंगा उत्तमरित्या भरल्या आहेत.आता चार-पाच दिवसानी कापणी करावी लागत होती. परंतु शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे कापणी करणे शक्य अशक्य झाले आहे. शेतातील पाणी सुकण्याकरिता दहा ते बारा दिवसाचा कालावधीत लागणार असल्याने तो पर्यंत हे सोयाबीन पुर्ण सडून जाण्याची शक्यता शेतकºयाने व्यक्त केली आहे.शुक्रवारच्या पावसाने वाढविली शेतकऱ्यांची चिंताशक्रवारी आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने काहींना फायदा तर काहींना नुकसानही सहन करावे लागले.

ते काम ४-५ वर्षापासून रखडले आहे. मागच्या वर्षी त्या शेतकऱ्याने तक्रार केली होती. त्यानुसार टेंडर काढून कंत्राटदाराला सदर कामाचा कंत्राट देण्यात आला. पण पावसाळ्याअभावी विलंब झाला आहे. तरी पण दसऱ्यापासून काम सुरू होणार आहे.-सुभाष इंगळे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती