शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या माती भराव्यामुळे शेतात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:09 IST

नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे.

ठळक मुद्दे३ ते ४ वर्षापासून काम रखडले : शेतकऱ्यांचे ६० हजार रूपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जामणीच्या शिवारातून गेलेला निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा पद्माकर अतकरे यांच्या शेतातून गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ताही तयार करण्यात आला असून या पांदण रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याकरिता चार वर्षापूर्वी सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. परंतु ते पाईप कालव्याच्या मातीनी पूर्णत: बुजून गेल्याने अतकरे यांच्या शेतातील पाणी अडले आहे. हे पाणी शेतातच साचून राहिल्याने शेतातील दोन एकरातील शेंगा भरलेले सोयाबीन पाण्याने सडून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास ६० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याकरिता संबंधित विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.सदर शेतकऱ्याने अर्ली व्हेरायटीचे ९३०५ सिद्ध कंपनी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी सुरूवातीलाच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात केल्यामुळे पेरणी उत्तमरित्या साधली होती. यामुळे सोयाबीन झाडाला शेंगा सुद्धा भरघोष आल्या आहे. शेंगा उत्तमरित्या भरल्या आहेत.आता चार-पाच दिवसानी कापणी करावी लागत होती. परंतु शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे कापणी करणे शक्य अशक्य झाले आहे. शेतातील पाणी सुकण्याकरिता दहा ते बारा दिवसाचा कालावधीत लागणार असल्याने तो पर्यंत हे सोयाबीन पुर्ण सडून जाण्याची शक्यता शेतकºयाने व्यक्त केली आहे.शुक्रवारच्या पावसाने वाढविली शेतकऱ्यांची चिंताशक्रवारी आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने काहींना फायदा तर काहींना नुकसानही सहन करावे लागले.

ते काम ४-५ वर्षापासून रखडले आहे. मागच्या वर्षी त्या शेतकऱ्याने तक्रार केली होती. त्यानुसार टेंडर काढून कंत्राटदाराला सदर कामाचा कंत्राट देण्यात आला. पण पावसाळ्याअभावी विलंब झाला आहे. तरी पण दसऱ्यापासून काम सुरू होणार आहे.-सुभाष इंगळे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती