शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कालव्याच्या माती भराव्यामुळे शेतात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:09 IST

नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे.

ठळक मुद्दे३ ते ४ वर्षापासून काम रखडले : शेतकऱ्यांचे ६० हजार रूपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजिकच्या जामणी शिवारातून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ता असून रस्त्याचे पाणी काढण्याकरिता पाईप टाकण्यात आले आहे. परंतू हे पाईप कालव्यातील मातीमुळे बुजल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जामणीच्या शिवारातून गेलेला निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा पद्माकर अतकरे यांच्या शेतातून गेला आहे. या कालव्याच्या बाजुने पांदण रस्ताही तयार करण्यात आला असून या पांदण रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याकरिता चार वर्षापूर्वी सिमेंटचे पाईप टाकण्यात आले होते. परंतु ते पाईप कालव्याच्या मातीनी पूर्णत: बुजून गेल्याने अतकरे यांच्या शेतातील पाणी अडले आहे. हे पाणी शेतातच साचून राहिल्याने शेतातील दोन एकरातील शेंगा भरलेले सोयाबीन पाण्याने सडून गेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास ६० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याकरिता संबंधित विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.सदर शेतकऱ्याने अर्ली व्हेरायटीचे ९३०५ सिद्ध कंपनी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी सुरूवातीलाच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात केल्यामुळे पेरणी उत्तमरित्या साधली होती. यामुळे सोयाबीन झाडाला शेंगा सुद्धा भरघोष आल्या आहे. शेंगा उत्तमरित्या भरल्या आहेत.आता चार-पाच दिवसानी कापणी करावी लागत होती. परंतु शुक्रवारी झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे कापणी करणे शक्य अशक्य झाले आहे. शेतातील पाणी सुकण्याकरिता दहा ते बारा दिवसाचा कालावधीत लागणार असल्याने तो पर्यंत हे सोयाबीन पुर्ण सडून जाण्याची शक्यता शेतकºयाने व्यक्त केली आहे.शुक्रवारच्या पावसाने वाढविली शेतकऱ्यांची चिंताशक्रवारी आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने काहींना फायदा तर काहींना नुकसानही सहन करावे लागले.

ते काम ४-५ वर्षापासून रखडले आहे. मागच्या वर्षी त्या शेतकऱ्याने तक्रार केली होती. त्यानुसार टेंडर काढून कंत्राटदाराला सदर कामाचा कंत्राट देण्यात आला. पण पावसाळ्याअभावी विलंब झाला आहे. तरी पण दसऱ्यापासून काम सुरू होणार आहे.-सुभाष इंगळे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती