शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:14 IST

यंदा पावसाने दडी मारल्याने आष्टी तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यांच्या झळा जाणवायल्या लागल्या आहे. आष्टी तालुक्यात बोरखेडी, थार, पंचाळा, किन्ही, मोई, तांग या भागात कोणी पाणी देता का पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यात भीषण परिस्थिती : थार गावात महिला अडीच किमीवरून आणतात पिण्यासाठी पाणी

पाणीसंकट तीव्र होणारलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यंदा पावसाने दडी मारल्याने आष्टी तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यांच्या झळा जाणवायल्या लागल्या आहे. आष्टी तालुक्यात बोरखेडी, थार, पंचाळा, किन्ही, मोई, तांग या भागात कोणी पाणी देता का पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. थार येथे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अडीच किमी अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणण्यात येत आहे. राज्य सरकारने आष्टी येथे चारा डेपो सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. अनेक तालुक्यात आताच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. दुसरीकडे येत्या एक ते दीड महिन्यात पाण्याचे टॅकर सुरू करून लोकांना पाणी पुरवावे वागणार आहे. शासन त्यातून कशी पळवाट काढता येईल या दुष्टीनेच या संकटाकडे पाहत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यापर्यंत ज्या पध्दतीने मदत जायला पाहिजे त्या प्रमाणात यंत्रणा कामाला लागल्याचे कुठेही दिसत नाही. जनावरासाठी चारा, पाणी, पिण्याचे पाणी याकडे लक्ष दिले जात नाही. कुटूंबातील काही लोक दोन-दोन कि.मी जनावरासाठी व आपल्यासाठी पिण्याचे पाणी आणतात. प्रशासनाचे यावर संपूर्ण दुर्लक्ष आहे. प्रशासनाचा कल फक्त चाल ढकल करण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. केवळ कागदोपत्री आकडेवारी आणि बातम्या देवून प्रशासन किती जोमाने काम करतात हा दिखावा करण्याचा काम फक्त प्रशासन करीत आहे. खेड्यातील लोकांमध्ये अशिक्षीतेचे प्रमाण जास्त असल्याने त्या लोकाच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे. कोणीच शेतकºयाला प्रत्यक्ष भेटून पाण्याची , दुष्काळी परिस्थिती जाणून घेत नाही. काही प्रशासनातील अधिकारी पाहणी न करता सरकारकडे अहवाल सादर करतात. आष्टी तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी या भागात अजुनही रोहयोची कामे सुरू करण्यात आलेली नाही. तसेच दुष्काळग्रस्त भागाला दिल्या जाणाºया सवलतीची माहितीही नागरिकांना देण्यात आलेली नाही. भारनियमनामुळे या भागात आणखीनच समस्या वाढली आहे.वर्धा जिल्ह्यात यावर्षी केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. जिल्ह्यातील १० जलाशयांपैकी केवळ एक जलाशय १०० टक्के भरले. उर्वरित जलाशयांत पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे विविध गावातील जलस्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारने संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना केवळ काही गावेच टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातील सर्वत्र तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचेही संकट भीषण स्वरूपात राहणार आहे. आष्टी तालुक्यात थार गावात आताच अडीच किमी अंतरावरून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. जनावरांच्या चाºयांचा व पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करून आहे.जानेवारी, फेब्रुवारी पासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. त्यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजनाा करायला हव्या. दुष्काळाचा सामना करताना लोकसहभाग महत्वाचा आहे. म्हणून प्रशासनाने गावा गावाचे दौरे करून काय मदत देवू केली ते जाहीर करावे. फक्त ठरावीक लोकानाच त्याचा फायदा होईल, असाा राजकीय दृष्टीक्षेप असायला नको, बाकीच्या लोकापर्यंत ही मदत पोहचली पाहिजे हा हेतू प्रशासनाचा व राजकीय पक्षाचा असला पाहिजे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करताता जाहीर केलेली मदत शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी व्यापक काम करण्याची गरज आहे.वर्धा जिल्ह्यात सुरूवातीला तीन तालुके टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने यातील समुद्रपूर तालुका वगळला, त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काही ठराविक गावे टंचाईग्रस्त घोषित केले आहे. या गावात पाणी पातळी खालावलेली असून प्रशासनाने केवळ टंचाईग्रस्त गावांची नावे जाहिर केली आहे. आष्टी तालुका सर्वाधिक संवेदनशील तालुका आहे. या गावात सर्वात जास्त गावे टंचाईग्रस्त भागात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेवून या गावातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागात पाणी पातळी खालावली आहे. तसेच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न एैरणीवर आला आहे. अनेकांनी आपली जनावरे दुसरीकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तर काही जण जनावरे विकत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई