शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

जलयुक्त शिवार योजनेमुळे उमरगावचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:25 IST

जमिनीत पाणी मुरावे, विहिरींची पाणी पातळी वाढावी, सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी तथा पाणीटंचाई कायम दूर व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देनदी नाले झाले तुडूंब : शेतकºयांना होणार या पाण्याचा उपयोग, अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची मागणी

कपिल जयस्वाल।लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : जमिनीत पाणी मुरावे, विहिरींची पाणी पातळी वाढावी, सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी तथा पाणीटंचाई कायम दूर व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. या अभियानातून उमरगावचे नंदनवनच झाले आहे. नदीला पाणी असून नालेही तुडूंब भरले आहेत. परिणामी, शेतकरी तथा ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी स्थानिक संस्था तथा शासकीय यंत्रणेमार्फत लाखो रुपये खर्च करून नदी, नाल्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करून त्यावर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. यातून पाणी अडविणे व जीरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब शेतीकरिता फलदायी ठरू लागली आहे. उमरगाव परिसरात मागील वर्षी लघुसिंचन विभाग जि.प. वर्धा यांच्यामार्फत लाखो रुपये खर्च करून पंचधारा नदीवर नव्याने सिमेंट बंधारे निर्माण करण्यात आले. नदी पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले. या बंधाºयामध्ये साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील शेतकºयांची सुमारे ५० एकर जमीन ओलिताखाली आली आहे. शेतातील विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन काही शेतकºयांची शेती पडिक राहत होती; पण आता या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पडिक शेती वहिवाटीखाली आली आहे. जलयुक्तमुळे शेतकºयांना प्रत्यक्ष फायदा होत आहे. यामुळे शेतकरी लघुसिंचन विभागाप्रती समाधान व्यक्त करीत आहे. लघुसिंचन विभागाने केलेल्या कामाचा दर्जा चांगला असल्याचे दिसून येते. शेतकºयांच्या शेतातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली आहे. या कामापासून शेतकºयांना त्रास होणार नाही, याची दक्षताही लघुसिंचन विभागाने घेतली आहे. विशेषत: शेतकºयांनी प्रत्यक्ष हजर राहून कामे करून घेतल्याने जलयुक्तचा लाभ दृष्टीस पडत आहे.अधिकाºयांच्या सूचनेवरून उमरगाव परिसरातील कामांची पाहणी दररोज शेतकरी करीत होते. काही ठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून सिमेंट पायली व बंधाºयाच्या दोन्ही बाजूने दगडाची पिचींग करण्यात आलेली नाही. यामुळे बंधाºयाच्या दोन्ही कडा वाहून गेल्यात. यातून चांगल्या कामाला डाग लावण्याचे कामच कंत्राटदाराने केल्याचे दिसते. लघुसिंचन विभगाने काम पूर्ण करून घेण्याची मागणी आहे.नदी, नाल्यांचे झाले पुनरूज्जीवन, विहिरींच्या पातळीत वाढसेलू तालुक्यातील उमरगाव परिसरात जि.प. लघु सिंचन विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. या कामांमुळे नदी, नाल्यांचे पुनरूज्जीवन झाले असून शेतातील तथा गावालगतच्या विहिरीची पाणी पातळी वाढल्याचे दिसून येत आहे.नदी तथा नाल्यांच्या पात्रामध्ये सिमेंट बंधारे बांधण्यात आल्याने सध्या पाणी साचलेले आहे. या साचलेल्या पाण्याचाही सिंचनासाठी वापर करणे शक्य झाले आहे. जलयुक्तच्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.