शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

जलयुक्त शिवार योजनेमुळे उमरगावचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:25 IST

जमिनीत पाणी मुरावे, विहिरींची पाणी पातळी वाढावी, सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी तथा पाणीटंचाई कायम दूर व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देनदी नाले झाले तुडूंब : शेतकºयांना होणार या पाण्याचा उपयोग, अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची मागणी

कपिल जयस्वाल।लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : जमिनीत पाणी मुरावे, विहिरींची पाणी पातळी वाढावी, सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी तथा पाणीटंचाई कायम दूर व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. या अभियानातून उमरगावचे नंदनवनच झाले आहे. नदीला पाणी असून नालेही तुडूंब भरले आहेत. परिणामी, शेतकरी तथा ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासाठी स्थानिक संस्था तथा शासकीय यंत्रणेमार्फत लाखो रुपये खर्च करून नदी, नाल्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करून त्यावर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. यातून पाणी अडविणे व जीरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब शेतीकरिता फलदायी ठरू लागली आहे. उमरगाव परिसरात मागील वर्षी लघुसिंचन विभाग जि.प. वर्धा यांच्यामार्फत लाखो रुपये खर्च करून पंचधारा नदीवर नव्याने सिमेंट बंधारे निर्माण करण्यात आले. नदी पात्राचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले. या बंधाºयामध्ये साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील शेतकºयांची सुमारे ५० एकर जमीन ओलिताखाली आली आहे. शेतातील विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन काही शेतकºयांची शेती पडिक राहत होती; पण आता या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पडिक शेती वहिवाटीखाली आली आहे. जलयुक्तमुळे शेतकºयांना प्रत्यक्ष फायदा होत आहे. यामुळे शेतकरी लघुसिंचन विभागाप्रती समाधान व्यक्त करीत आहे. लघुसिंचन विभागाने केलेल्या कामाचा दर्जा चांगला असल्याचे दिसून येते. शेतकºयांच्या शेतातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली आहे. या कामापासून शेतकºयांना त्रास होणार नाही, याची दक्षताही लघुसिंचन विभागाने घेतली आहे. विशेषत: शेतकºयांनी प्रत्यक्ष हजर राहून कामे करून घेतल्याने जलयुक्तचा लाभ दृष्टीस पडत आहे.अधिकाºयांच्या सूचनेवरून उमरगाव परिसरातील कामांची पाहणी दररोज शेतकरी करीत होते. काही ठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून सिमेंट पायली व बंधाºयाच्या दोन्ही बाजूने दगडाची पिचींग करण्यात आलेली नाही. यामुळे बंधाºयाच्या दोन्ही कडा वाहून गेल्यात. यातून चांगल्या कामाला डाग लावण्याचे कामच कंत्राटदाराने केल्याचे दिसते. लघुसिंचन विभगाने काम पूर्ण करून घेण्याची मागणी आहे.नदी, नाल्यांचे झाले पुनरूज्जीवन, विहिरींच्या पातळीत वाढसेलू तालुक्यातील उमरगाव परिसरात जि.प. लघु सिंचन विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. या कामांमुळे नदी, नाल्यांचे पुनरूज्जीवन झाले असून शेतातील तथा गावालगतच्या विहिरीची पाणी पातळी वाढल्याचे दिसून येत आहे.नदी तथा नाल्यांच्या पात्रामध्ये सिमेंट बंधारे बांधण्यात आल्याने सध्या पाणी साचलेले आहे. या साचलेल्या पाण्याचाही सिंचनासाठी वापर करणे शक्य झाले आहे. जलयुक्तच्या कामांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.