शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाढलेल्या खुरांमुळे वळू सोसतोय मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:17 IST

वाढते वय...खपाटीला गेलेलं पोट....चालताना लागणारी धाप... यामुळे थोडं अंतर पार करायचं म्हटले अतिशय कठीणावस्थेतून जावे लागते. अशातच पायांच्या वाढलेल्या खुरा आणखीच डोईजड झाल्याने शहरातील एक वळू असह्य वेदना सहन करीत आहे;.....

ठळक मुद्देनगरपालिका प्रशासन, वन्यजीव संघटनांच्या संवेदना झाल्यात बोथट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढते वय...खपाटीला गेलेलं पोट....चालताना लागणारी धाप... यामुळे थोडं अंतर पार करायचं म्हटले अतिशय कठीणावस्थेतून जावे लागते. अशातच पायांच्या वाढलेल्या खुरा आणखीच डोईजड झाल्याने शहरातील एक वळू असह्य वेदना सहन करीत आहे; पण त्याच्या या वेदनामय प्रवासाकडे ना पालिका प्रशासनाचे लक्ष आहे, ना वन्यजीव, सामाजिक संघटनांचे. त्यामुळे प्राण्यांप्रतींची ‘करुणा’ हरविली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील कित्येक महिन्यांपासून पायाच्या खुरा वाढलेला वळू शहरात फिरत आहे. शहरातील शिवाजी चौक, पावडे चौक, धंतोली चौक आणि ठाकरे मार्केट परिसरात त्याचा नेहमीच वावर असतो. अर्धे आयुष्य पार केलेला हा वळू पायांच्या वाढलेल्या खुरांमुळे असह्य वेदनेने विव्हळत आहे. खुरा रस्त्याला घासत असल्याने त्याला चालणेही अवघड झाले आहे. परिणामी, त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच आहे.या वळूबाबत नागरिकांनी अनेकदा नगरपालिका व शहरात कार्यरत विविध वन्यजीव व सामाजिक संघटनांना माहिती दिली. मात्र, कुणालाही पाझर फुटला नाही. केवळ जबाबदारीची ढकलाढकलच अनुभवाला आली. त्यामुळे वन्यजीव, पशुसंवर्धनाचा आव आणणाऱ्या संघटना गेल्या तरी कुठे? मुक्या प्राण्यांच्या या वेदना जर या संघटना अन् पालिकेला कळत नसतील तर प्राण्यांच्या नावे संघटनेचा डोलारा वाढविणे कितपत योग्य आहे. ‘जगण्याने छळलेल्या या वळूची मरणानंतरच त्रासातून सुटका होईल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे काही संघटना आम्ही प्राणी प्रेमी असल्याचे मिरवितात; पण त्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना अद्याप जाग आली नसल्याचे दिसून येत आहे.