शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

महामार्गामुळे तीन तालुक्यात आली ‘समृद्धी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:43 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे.

ठळक मुद्दे३४ गावांना लाभ : ७३५ शेतकऱ्यांचे उंचावले जीवनमान

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे जाळे विणले जात असताना या महामार्गाकरिता वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू व आर्वी या तीन तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचा ७३५ शेतकऱ्यांना जवळपास ३५१ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे. यामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकरी समृद्ध झाले असून त्याचे जीवनमानही उंचावले आहे.रस्ते, महामार्ग या विकासाच्या रक्तवाहिन्या समजल्या जातात. त्यामुळे शासनाने रस्ते व महामार्ग निर्मितीवर भर दिला आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातून जात असल्याने या तिन्ही तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची ५७९.४६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यापैकी ७७३ शेतकऱ्यांनी संपादनाकरिता संमती दर्शविली आहे. शासनाने आतापर्यंत ७३५ शेतकऱ्यांकडून ४९८.८१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. उर्वरित १४१ शेतकऱ्यांची ८०.६४ हेक्टर जमीन संपादित करणे शिल्लक आहे. तिन्ही तालुक्यातील ७३५ शेतकऱ्यांना शासनाने ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा मोबदला दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान पालटले असून इतरही शेतकऱ्यांच्या शेतीला सोन्यापेक्षाही झळाळी आली आहे. परिणामी, महामार्गाने नावाप्रमाणेचे शेतकऱ्यांचे जीवनही समृद्ध केले आहे.सेलू तालुका कोट्यधीशांचासमृद्धी महामार्गाकरिता वर्धा, आर्वी व सेलू या तिन्ही तालुक्यांपैकी सेलू तालुक्यातील सर्वाधिक जमीन खरेदी करण्यात आली. सेलू तालुक्यातील शेतीही सुपीक व बागायती असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मोबदला मिळाला आहे. वर्धा तालुक्यातील २९२ शेतकऱ्यांपैकी २७१ शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली असून त्यापैकी २३९ शेतकऱ्यांची १७५.६२२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. आर्वी तालुक्यातील १८५ शेतकऱ्यांपैकी १६५ शेतकऱ्यांकडून १०१. ६१ हेक्टर जमीन संपादित केली आहे, तर सेलू तालुक्यातील ३९९ शेतकऱ्यांपैकी ३३९ शेतकऱ्यांनी सहमती दर्शविल्याने आतापर्यंत ३३१ शेतकऱ्यांकडून २२१.५८ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली आहे. याचा मोबदला म्हणून या शेतकºयांना २०७ कोटी ७० लाख ०८ हजार ३६० रुपये देण्यात आले आहे. हा मोबदला दोन्ही तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.३४ गावांतील शेतकऱ्यांचा वाढला बँक बॅलन्सवर्धा तालुक्यातील महाकाळ, पिपरी (मेघे),पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रस, झाडगाव, वाठोडा, धामणगाव, डोरली व लोणसावळी तर आर्वी तालुक्यातील बोरी, माणकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरुळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव आणि सेलू तालुक्यातील सेलडोह, खडकी (आ.),धोंडगाव, आमगाव(ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे) या ३४ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गात गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. दरवर्षी बँक खात्यात राहणारा ठणठणाट आता दूर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात मोठी रक्कम आल्याने शेतकऱ्यांनी त्याची गुंतवणूक करीत दुसरी शेती घेण्यासोबतच लहान-मोठा व्यवसायही सुरू केला. काहींनी उद्योग उभारला. तसेच मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम व मुला-मुलींच्या विवाहाची तडजोड करून ठेवली आहे. तर काहींनी वाहने खरेदीसह ऐशोआरामावर भर दिल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग