शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत टाकली जाणार जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 9:36 PM

शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे तत्काळ कार्यवाहीचे निर्देश : भोयर यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. आ. भोयर यांनी याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी केली. शहर व लगतच्या १३ गावांमध्ये धाममधून पाणीपुरवठा करण्यात येतो.शहराला नगर परिषद तर १३ गावांना जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. येळाकेळी येथील पंपिंग स्टेशनवरून हा पाणीपुरवठा करण्यात येतो. महाकाली धरणातून पाणी सोडल्यानंतर ते येळाकेली येथील बंधाऱ्यावर अडविण्यात येते. परंतु, अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी धरणात जलसंचय कमी झाला. परिणामी, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. धरणाची उंची वाढविल्यास पाणी समस्या निकाली निघेल सोबतच शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी मिळेल. याबाबत पाठपुरावा करूनदेखील कार्यवाही झाली नाही. प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याने त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. उन्हाळ्यात महाकाळी जलाशयातून वर्धा व लगतच्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात येते. अंतर अधिक असल्याने २५ टक्के पाणी केवळ येळाकेलीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत पाईपलाईन टाकल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच वर्ध्यासह लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणे सोईचे जाईल.