शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

थंडीमुळे जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांवर

By admin | Updated: November 27, 2014 23:40 IST

जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील

पांघरुणामुळे डासांना प्रतिबंध : जाड कपडेही ठरतात उपयोगीयवतमाळ : जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील गर्दीही बऱ्यापैकी ओसरली आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली होती. यातील बहुतांश रुग्ण व्हायरल फिवरचे होते. यासोबतच जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावर्षी डेंग्यूने दोन रुग्णांचा तर तापाने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. डेंग्यूचे संशयित म्हणून एक हजार ४०० रुग्णांचे रक्त नमुने घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केली गेली. त्यात १०४ रुग्णांचे रक्त नमुने पॉझिटीव्ह आढळून आले. त्यांना वेळीच उपचार करून यातून बाहेर काढले गेले. विविध प्रकारच्या तापाची साथ आतापर्यंत कायम आहे. जिल्ह्यातील १६ उपजिल्हा रुग्णालये, ४६५ आरोग्य उपकेंद्र आणि ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रात तापाच्या रुग्णांची नोंद घेतली गेली. शासकीय रुग्णालयात दरदिवशी ओपीडीमध्ये नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपैकी तब्बल २० टक्के रुग्ण हे विविध प्रकारांच्या तापाचे असल्याचे तपासणीत आढळून आले. गेली काही महिने यवतमाळ जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ २० टक्के एवढा होता. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे हा फिवर रेट १२ टक्क्यांनी कमी होवून आठ टक्क्यांवर आला आहे. थंडी आणखी वाढताच हा ‘फिवर रेट’ एक-दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. ‘फिवर रेट’ कमी होण्यासाठी थंडी सर्वाधिक उपयोगी ठरली आहे. कारण थंडीमुळे नागरिक अंगावर जाड कपडे घालतात. झोपताना पूर्णवेळ अंगावर पांघरूण राहते. त्यामुळे डास चावत नाही. पर्यायाने डेंग्यू व तापाची लागण होत नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत हिवताप विभागाने खास सप्ताह राबवून फॉगिंग, कोरडा दिवस, नाल्या वाहत्या करणे, उकिरडे गावाबाहेर हलविणे आदी उपक्रम घेतले. त्याचा फायदा नागरिकांच्या आरोग्यासाठी होत असल्याचे सांगण्यात आले. हिवताप विभागाला निधी, वाहनांची अडचण असल्याने अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास अडचण येत असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली. (जिल्हा प्रतिनिधी)