शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
4
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
5
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
6
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
7
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
8
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
9
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
10
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
11
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
12
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
13
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
14
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
15
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
16
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
17
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
18
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
19
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
20
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांवर

By admin | Updated: November 27, 2014 23:40 IST

जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील

पांघरुणामुळे डासांना प्रतिबंध : जाड कपडेही ठरतात उपयोगीयवतमाळ : जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील गर्दीही बऱ्यापैकी ओसरली आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली होती. यातील बहुतांश रुग्ण व्हायरल फिवरचे होते. यासोबतच जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावर्षी डेंग्यूने दोन रुग्णांचा तर तापाने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. डेंग्यूचे संशयित म्हणून एक हजार ४०० रुग्णांचे रक्त नमुने घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केली गेली. त्यात १०४ रुग्णांचे रक्त नमुने पॉझिटीव्ह आढळून आले. त्यांना वेळीच उपचार करून यातून बाहेर काढले गेले. विविध प्रकारच्या तापाची साथ आतापर्यंत कायम आहे. जिल्ह्यातील १६ उपजिल्हा रुग्णालये, ४६५ आरोग्य उपकेंद्र आणि ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रात तापाच्या रुग्णांची नोंद घेतली गेली. शासकीय रुग्णालयात दरदिवशी ओपीडीमध्ये नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येपैकी तब्बल २० टक्के रुग्ण हे विविध प्रकारांच्या तापाचे असल्याचे तपासणीत आढळून आले. गेली काही महिने यवतमाळ जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ २० टक्के एवढा होता. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे हा फिवर रेट १२ टक्क्यांनी कमी होवून आठ टक्क्यांवर आला आहे. थंडी आणखी वाढताच हा ‘फिवर रेट’ एक-दोन टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. ‘फिवर रेट’ कमी होण्यासाठी थंडी सर्वाधिक उपयोगी ठरली आहे. कारण थंडीमुळे नागरिक अंगावर जाड कपडे घालतात. झोपताना पूर्णवेळ अंगावर पांघरूण राहते. त्यामुळे डास चावत नाही. पर्यायाने डेंग्यू व तापाची लागण होत नाही, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ ते १९ नोव्हेंबरपर्यंत हिवताप विभागाने खास सप्ताह राबवून फॉगिंग, कोरडा दिवस, नाल्या वाहत्या करणे, उकिरडे गावाबाहेर हलविणे आदी उपक्रम घेतले. त्याचा फायदा नागरिकांच्या आरोग्यासाठी होत असल्याचे सांगण्यात आले. हिवताप विभागाला निधी, वाहनांची अडचण असल्याने अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास अडचण येत असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली. (जिल्हा प्रतिनिधी)