शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

भाजपा-काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी कामगारांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:38 IST

सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले ....

ठळक मुद्देएम.एच. शेख : ५ सप्टेंबरला दिल्लीत काढणार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले व जगभरातील उद्योगपतींसह देशभरातील मोठ्या श्रीमंत उद्योगपतींना प्रचंड सवलती देवून जनतेच्या पैशाने उभारले सार्वजनिक कारखाने बंद करून उद्योगपतींना कवडीमोल भावात विकले असा आरोप सेंटर आॅफ इंडीयन ट्रेड युनिसन्स (सिटू) चे राज्य जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. एम.एच. शेख, यांनी जिल्हा सिटूच्या विस्तारीत बैठकीत केला.आशा वर्कर कर्मचारी संघटनेच्या सचिव अर्चना घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली. याप्रसंगी मंचावर सिटूचे राज्य कोषाध्यक्ष के.आर. रघु, उपाध्यक्ष सदई अहमद, सिटूचे राज्य कौन्सील सदस्य, नगरसेवक यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, जिल्हाध्यक्ष रंजना सावरकर उपस्थित होते.बैठकीत कामगार रामभाऊ ठावरी, घिमे, अनिता राऊत, संध्या संभे, रमा ढोले, सविता जगताप, कल्पना चहांदे, प्रमिला वानखेडे, तुषार येवतकर, महादेव मोहिते, महावीर काच्छी, नागमोते यांनी आपल्या समस्यास मांडल्या.यावेळी बोलताना शेख म्हणाले की, खाजगी उद्योगपतींच्या हितार्थ कामगार कायद्यांत मालकांच्या हिताचे बदल केले. शेती क्षेत्रात विदेशी बियाणे कंपन्यांना परवानगी दिली. विदेशी शेतमालाचे आयातीवरील सर्व बंधने हटविली गेली. परिणामी विकास होण्याऐवजी बंद उद्योगांची संख्या वाढली. कामगार बेरोजगार झाले. या बैठकीत ९ आॅगस्टच्या वर्धा सत्याग्रही मोर्चा व ५ सप्टेंबर २०१८ चा दिल्ली मोर्चाची तयारीबाबत चर्चा झाली संचालन भैय्या देशकर तर आभार रंजना सावरकर यांनी मानले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस