शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-काँग्रेसच्या धोरणामुळे शेतकरी कामगारांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:38 IST

सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले ....

ठळक मुद्देएम.एच. शेख : ५ सप्टेंबरला दिल्लीत काढणार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सन १९९१ रोजी तत्कालीन काँग्रेसच्या नरसिंहराव-मनमोहनसिंग सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. या व्यवस्थेमुळे देशाचा विकास होईल, रोजगार वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले व जगभरातील उद्योगपतींसह देशभरातील मोठ्या श्रीमंत उद्योगपतींना प्रचंड सवलती देवून जनतेच्या पैशाने उभारले सार्वजनिक कारखाने बंद करून उद्योगपतींना कवडीमोल भावात विकले असा आरोप सेंटर आॅफ इंडीयन ट्रेड युनिसन्स (सिटू) चे राज्य जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. एम.एच. शेख, यांनी जिल्हा सिटूच्या विस्तारीत बैठकीत केला.आशा वर्कर कर्मचारी संघटनेच्या सचिव अर्चना घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली. याप्रसंगी मंचावर सिटूचे राज्य कोषाध्यक्ष के.आर. रघु, उपाध्यक्ष सदई अहमद, सिटूचे राज्य कौन्सील सदस्य, नगरसेवक यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, भैय्या देशकर, जिल्हाध्यक्ष रंजना सावरकर उपस्थित होते.बैठकीत कामगार रामभाऊ ठावरी, घिमे, अनिता राऊत, संध्या संभे, रमा ढोले, सविता जगताप, कल्पना चहांदे, प्रमिला वानखेडे, तुषार येवतकर, महादेव मोहिते, महावीर काच्छी, नागमोते यांनी आपल्या समस्यास मांडल्या.यावेळी बोलताना शेख म्हणाले की, खाजगी उद्योगपतींच्या हितार्थ कामगार कायद्यांत मालकांच्या हिताचे बदल केले. शेती क्षेत्रात विदेशी बियाणे कंपन्यांना परवानगी दिली. विदेशी शेतमालाचे आयातीवरील सर्व बंधने हटविली गेली. परिणामी विकास होण्याऐवजी बंद उद्योगांची संख्या वाढली. कामगार बेरोजगार झाले. या बैठकीत ९ आॅगस्टच्या वर्धा सत्याग्रही मोर्चा व ५ सप्टेंबर २०१८ चा दिल्ली मोर्चाची तयारीबाबत चर्चा झाली संचालन भैय्या देशकर तर आभार रंजना सावरकर यांनी मानले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस