शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

दुबार पेरणीचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:34 IST

पाऊस धारा कोसळताच शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पेरण्या साधल्या असे वाटत असतानाच गत तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दांडी मारली. पेरलेले बियाणे अंकुरले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या आटोपल्या असून उगविलेले अंकूर तापत असलेल्या उन्हामुळे करपणे ...

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ६० टक्के पेरण्या आटोपल्या : दुबार पेरणीकरिता मोफत बी-बियाण्यांची मागणी

पाऊस धारा कोसळताच शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पेरण्या साधल्या असे वाटत असतानाच गत तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दांडी मारली. पेरलेले बियाणे अंकुरले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या आटोपल्या असून उगविलेले अंकूर तापत असलेल्या उन्हामुळे करपणे सुरू झाले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिंकलनच्या सहायाने उगविलेले पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून पीक वाचणे शक्य नाही. यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाशिवाय पर्याय नाही. यात आता दोन दिवसात पाऊस आला नाही तर पेरणीची मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. गत हंगामात आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यातच आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याचे चित्र निर्माण आहे. आलेले संकट कसे पेलावे या आशेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी दिसत आहे. यामुळे दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून बियाणे आणि खते पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : मान्सून वेळेवर आणि भरपूर प्रमाणात येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी बीयांची लागवण केली. तीन दिवसानंतर हवामान खात्याला उपरती झाली हा मान्सूनपूर्व पाऊस असून मान्सूनचा पाऊस यायला अडचणी निर्माण झाल्याने तो नंतर येणार असल्याचे सांगितले. पावसाळ्याच्या नक्षत्रात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पावसाच्या दडीने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आल्याचे दिसत आहे.कृषी विभागाच्या सूचनेनुसार ६५ मि.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, आता हा ६५ मि.मी पाऊस एका दिवसात पडणारा की एकूण पडलेला पाऊस हे समजायला मार्ग नाही. जर एका दिवसात ६५ मि.मी. पाऊस झाला तर ती अतिवृष्टी समजली जाते. बोंडअळीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी यंदा मान्सूनपूर्व लागवड केली नाही. डिसेंबरनंतर फरदड घेवू नये, अशा सूचना कृषी विभागामार्फत दिल्या जात आहे. जर जुलैमध्ये दुबार पेरणी करावी लागली तर त्या कपाशीला कधी बोंड येईल व कापूस कधी वेचला जाईल त्यामुळे डिसेंबरचे वेळापत्रक पाळणे अवघडच आहे. डिसेंबर नंतर बोंडअळी आली तर कृषी विभाग पर्यायाने शासन हातवर करणार, हे आताच दिसून येत आहे.पवनार परिसरात जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. त्यापैकी ६० टक्के शेतकरी हा कोरडवाहू आहे. जर दोन दिवसात पाऊस नाही आला तर त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट गडद झाल्याचे दिसत आहे. ओलीत करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केल्यास भारनियमनामुळे तेही शक्य होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांवरचे संकट प्रत्येक वर्षी नवनव्या वेषात येत असल्याचे बोलले जात आहे.बोंडअळीचे अनुदानबोेंडअळीचे अनुदान बुधवारी जमा होईल हे नायब तहसीलदार दीपक राऊत यांनी ठासून सांगितल्यानंतरही ते शुक्रवार पर्यंत जमा झालेले नाही. शुक्रवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेवून सांगतो असे मोघम उत्तर दिले, व नंतर मात्र त्यानी चुप्पीच साधल्याचे दिसले.

टॅग्स :agricultureशेती