शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चालकाला लागली डुलकी अन् अनियंत्रित मालवाहू उलटली; १० ते १५ प्रवासी गंभीर जखमी

By चैतन्य जोशी | Updated: August 29, 2022 16:07 IST

धोंडगाव येथील अपघात, जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु

गिरड (वर्धा) : मालवाहू चालकाला डुलकी आल्याने अनियंत्रित झालेले वाहन रस्त्याकडेला पलटले. हा अपघात धोंडगाव जवळील मुनेश्वर नगर परिसरात २८ रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास झाला. अपघातात मालवाहू चक्काचूर झाला असून १० ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

एम.एच. ३४ बी.जी. ६१९६ क्रमांकाचे मालवाहू वाहनात दहा ते पंधरा प्रवासी वरोरा येथे जात होते. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाला डुलकी आल्याने स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होत पलट्या खाऊन रस्त्याकडेला जाऊन पलटले. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती शिक्षक सुभाष ननावरे याच्या माहिती होताच त्यांनी पोलिसांना सांगितले.१०८ क्रमांकावर फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने त्यांनी मित्राच्या खासगी वाहनाने व पोलीस विभागाच्या वाहनाने समुद्रपूर रुग्णालाता जखमींना घेऊन गेले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनिल दहिभाते, राहुल मानकर यांनी अपघातस्थळ गाठून पंचनामा केला.

धोंडगाव वासियांची तत्परता

मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास गावातील तरुणांनी वेळ वाया न घालवता जखमींना स्वत:च्या वाहनाने व पोलीस वाहनाने समुद्रपूर येथे हलविले. मात्र, पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने गावातील लोकांनी त्यांना मदत दिली.

ग्रामीण आरोग्याचा उडाला बोजवारा

जखमींना पुढील प्रवासासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. मात्र, दोन तास होऊनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. अखेर नागरिकांनी पैसे गोळा करुन जखमींची मदत केली.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा