शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना ब्लिचिंगविना पिण्याचे पाणी

By admin | Updated: May 22, 2014 01:21 IST

पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतींमधील नागरिकांना भर उन्हाळ्यात ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ आली आहे.

सेलू : पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतींमधील नागरिकांना भर उन्हाळ्यात ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ आली आहे. याला सचिवांचे दुर्लक्षीतपण व सरपंचाचे अज्ञान कारणीभूत ठरत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या स्त्रोतांची खोली वाढली. अनेक ठिकाणी पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. अनेकांचे नळ खड्डय़ात आहे. तेव्हा नळांना येणारे पाणी घेणे झाल्यावर त्या खड्डय़ातील दूषित झालेले पाणी पुन्हा नळाद्वारे परत जाते. अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह व लिकेजमुळेही पाणी दूषित होते. अशावेळी नियमित पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावा, असा सूचना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (आरोग्य) ग्रामसेवकांना नियमित देतात. मात्र काही वेळकाढू ग्रामसेवक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात व ब्लिचिंग पावडर टाकत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ येते. लहानमोठय़ा आजाराचे रुग्ण यामुळे दवाखान्यात गर्दी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अनेक लहान ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा ग्रामपंचायतींसाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून पन्नास टक्के अनुदानावर ब्लिचिंग पावडर पुरविल्या जाते. तालुक्यात असलेल्या ६२ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींना हे पावडर सद्या पुरविल्या गेले, मात्र यासाठी पंचायत समितीची तुटपूंजी आर्थिक तरतुदही धक्कादायकच आहे.

पंचायत समितीने शेष फंडातून पन्नास हजार रुपयांच्या ब्लिचिंग पावडरची खरेदी केली.यात ५५0 रुपये नगाप्रमाणे ३५ किलोच्या ६२ ब्लिचिंग पावडरच्या बॅग खरेदी केल्या. त्या ५0 टक्के अनुदानावर २७५ रुपये नगप्रमाणे ४२ ग्रामपंचायतींना दिल्या. काही ग्रा.पं.ना दोन तर काहींच्या वाट्याला एकच बॅग आली. ब्लिचींग पावडर नियमित टाकल्यावर तो किती दिवस पुरेल, हा प्रश्न आहे.

अनेक ग्रामपंचायत हे पावडर जास्त दिवस पुरले पाहिजे म्हणून नियमित टाकत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. उत्पनाच्या मोठय़ा ग्रामपंचायतींना शंभर टक्के रक्कम भरुन हे पावडर घ्यावे लागते. मात्र ते दर्जेदार व आयएसआय मार्क असावे, याची काळजी घेत ज्यांनी ७२ बॅग पुरविल्या. त्याच वितरकाकडून दर्जेदार पावडर देण्यासाठी पं.स.ने करारनामा केला. ज्या मोठय़ा उत्पन्नाच्या ग्रामपंचायती आहे. त्यांना ५५0 रुपये बॅगप्रमाणे हे ब्लिचिंग पावडर पुरविण्याचे धोरण असल्याचे सांगितले.

पावसाळा तोंडावर आहे. आर्थिक स्थिती खराब असलेल्या ग्रामपंचायतीकडे असलेले ब्लिचिंग पावडर संपणार आहे. सद्या अनेकाकडे साठाच उपलब्ध नाही. पंचायत समितीने केवळ शेषफंडातून पन्नास हजार एवढी तुटपूंजी तरतुद केली. आरोग्याच्या महत्त्वपूर्ण जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल कुणाचीच गंभीरता दिसून येत नाही.(तालुका प्रतिनिधी)