शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

चार महिन्यांपासून दिलेली कागदपत्रे धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:42 IST

चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत.

ठळक मुद्देशेकडो शेतकरी वाऱ्यावर : व्यापाऱ्यांच्या बाजूने मार्केटिंग व खविसच्या कर्मचाऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा तसेच खविस कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ते व्यापाऱ्यांच्या बाजूनेतर नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.व्यापाºयांची बाजू सावारल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेली शासनाची सदर योजना शेतकºयांसाठी फसवी ठरू पाहत आहे. या बाबीची जिल्हाधिकारी व डीडीआर यांनी गंभीर दखल घेवून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान सातबारा व इतर कागदपत्रे दिली. परंतु, नाफेड व खविस प्रशासनाने या सर्व कागदपत्रांची रजिस्टरवर कुठेही नोंद न घेतल्याने ही कागदपत्रे अजूनही धुळखात पडली आहेत. गेल्या चार महिण्यांपासून पायपीट करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने गरजू ठरलेले कास्तकार खरीप हंगामाच्या तोंडावर हवालदिल झाले आहे. आजपावेतो या केंद्रावर ८ हजार २३७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. परंतु, यापैकी बहुतांश खरेदी सोयीबीनची व तीही व्यापाऱ्यांच्या झोळीत टाकण्यात आली. उर्वरीत नऊ ते दहा हजार क्विंटल तुरीचे कागदपत्रे अजूनही आॅनलाईन प्रक्रियेसाठी प्रतीक्षेत आहे. तर कागदपत्रे धुळ खात आहेत. प्रत्येक्षात आॅनलाईन प्रक्रियेसाठी आलेल्या शेतकऱ्यांची क्रमाक्रमाने नोंदणी करून तितकाच माल मोजणे क्रमप्राप्त आहे. मात्र, घाई झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही पद्धत मोडीत काढून व्यापाऱ्यांच्या मालाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे तुरीने भरून असलेले खाजगी व्यापाऱ्यांची गोदामे नाफेडच्या खरेदीत खाली झाली. लाखोंचा मलीदाही लाटण्यात आला. इतेच नव्हे तर शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.काही शेतकºयांना अश्रुही झाले अनावरशेतकरी वासूदेव कांबळे यांनी २ मे रोजी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणली; पण त्यांना विविध कारणे पुढे करीत शेतमाल परत नेण्यास सांगण्यात आले. या हवालदिल झालेल्या शेतकºयाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी