शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

चार महिन्यांपासून दिलेली कागदपत्रे धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:42 IST

चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत.

ठळक मुद्देशेकडो शेतकरी वाऱ्यावर : व्यापाऱ्यांच्या बाजूने मार्केटिंग व खविसच्या कर्मचाऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा तसेच खविस कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ते व्यापाऱ्यांच्या बाजूनेतर नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.व्यापाºयांची बाजू सावारल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेली शासनाची सदर योजना शेतकºयांसाठी फसवी ठरू पाहत आहे. या बाबीची जिल्हाधिकारी व डीडीआर यांनी गंभीर दखल घेवून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान सातबारा व इतर कागदपत्रे दिली. परंतु, नाफेड व खविस प्रशासनाने या सर्व कागदपत्रांची रजिस्टरवर कुठेही नोंद न घेतल्याने ही कागदपत्रे अजूनही धुळखात पडली आहेत. गेल्या चार महिण्यांपासून पायपीट करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने गरजू ठरलेले कास्तकार खरीप हंगामाच्या तोंडावर हवालदिल झाले आहे. आजपावेतो या केंद्रावर ८ हजार २३७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. परंतु, यापैकी बहुतांश खरेदी सोयीबीनची व तीही व्यापाऱ्यांच्या झोळीत टाकण्यात आली. उर्वरीत नऊ ते दहा हजार क्विंटल तुरीचे कागदपत्रे अजूनही आॅनलाईन प्रक्रियेसाठी प्रतीक्षेत आहे. तर कागदपत्रे धुळ खात आहेत. प्रत्येक्षात आॅनलाईन प्रक्रियेसाठी आलेल्या शेतकऱ्यांची क्रमाक्रमाने नोंदणी करून तितकाच माल मोजणे क्रमप्राप्त आहे. मात्र, घाई झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही पद्धत मोडीत काढून व्यापाऱ्यांच्या मालाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे तुरीने भरून असलेले खाजगी व्यापाऱ्यांची गोदामे नाफेडच्या खरेदीत खाली झाली. लाखोंचा मलीदाही लाटण्यात आला. इतेच नव्हे तर शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.काही शेतकºयांना अश्रुही झाले अनावरशेतकरी वासूदेव कांबळे यांनी २ मे रोजी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणली; पण त्यांना विविध कारणे पुढे करीत शेतमाल परत नेण्यास सांगण्यात आले. या हवालदिल झालेल्या शेतकºयाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी