शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून दिलेली कागदपत्रे धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:42 IST

चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत.

ठळक मुद्देशेकडो शेतकरी वाऱ्यावर : व्यापाऱ्यांच्या बाजूने मार्केटिंग व खविसच्या कर्मचाऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणा तसेच खविस कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ते व्यापाऱ्यांच्या बाजूनेतर नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.व्यापाºयांची बाजू सावारल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेली शासनाची सदर योजना शेतकºयांसाठी फसवी ठरू पाहत आहे. या बाबीची जिल्हाधिकारी व डीडीआर यांनी गंभीर दखल घेवून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान सातबारा व इतर कागदपत्रे दिली. परंतु, नाफेड व खविस प्रशासनाने या सर्व कागदपत्रांची रजिस्टरवर कुठेही नोंद न घेतल्याने ही कागदपत्रे अजूनही धुळखात पडली आहेत. गेल्या चार महिण्यांपासून पायपीट करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने गरजू ठरलेले कास्तकार खरीप हंगामाच्या तोंडावर हवालदिल झाले आहे. आजपावेतो या केंद्रावर ८ हजार २३७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. परंतु, यापैकी बहुतांश खरेदी सोयीबीनची व तीही व्यापाऱ्यांच्या झोळीत टाकण्यात आली. उर्वरीत नऊ ते दहा हजार क्विंटल तुरीचे कागदपत्रे अजूनही आॅनलाईन प्रक्रियेसाठी प्रतीक्षेत आहे. तर कागदपत्रे धुळ खात आहेत. प्रत्येक्षात आॅनलाईन प्रक्रियेसाठी आलेल्या शेतकऱ्यांची क्रमाक्रमाने नोंदणी करून तितकाच माल मोजणे क्रमप्राप्त आहे. मात्र, घाई झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही पद्धत मोडीत काढून व्यापाऱ्यांच्या मालाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे तुरीने भरून असलेले खाजगी व्यापाऱ्यांची गोदामे नाफेडच्या खरेदीत खाली झाली. लाखोंचा मलीदाही लाटण्यात आला. इतेच नव्हे तर शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.काही शेतकºयांना अश्रुही झाले अनावरशेतकरी वासूदेव कांबळे यांनी २ मे रोजी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणली; पण त्यांना विविध कारणे पुढे करीत शेतमाल परत नेण्यास सांगण्यात आले. या हवालदिल झालेल्या शेतकºयाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी