शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची एन्ट्री तब्बल सव्वा तासांनी

By admin | Updated: June 26, 2014 23:26 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरू असल्याचे विदारक वास्तव गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून ‘लोकमत’ने

सरकारी रुग्णालयांचे विदारक वास्तव : रुग्णालयांचा परिसर घाण व दुर्गंधीयुक्तवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरू असल्याचे विदारक वास्तव गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले. हे रुग्णालये जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी की वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी, असा सहज प्रश्न जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थितीवरुन निर्माण झाला. सकाळी ८.३० वाजतापासून सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्णांची गर्दी सुरू झालेली होती. रुग्ण आपली प्रकृती दाखविण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षापुढे ताटकळत होते. नऊलाही डॉक्टर आले नाही. काही अपवाद वगळता बहुतांश डॉक्टरची एन्ट्री साडे नऊ वाजतानंतर सुरू झाली. वास्तविक, बाह्य रुग्णांना तपासणीची वेळ ही सकाळी ८.३० ते १२.३० वा १ वाजतापर्यंतची आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी कधीही ही वेळ पाळत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे काही रुग्णांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक गैरहजर होते. ते औरंगाबादला बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मागील काही दिवसांपासून सुटीवर असल्यामुळे त्यांचा प्रभार ज्यांच्याकडे आहे त्यासुद्धा वेळेत उपस्थित झालेल्या नव्हत्या. त्यांच्या कक्षासमोर विचारले असता मॅडम आता येईल, असे सांगण्यात आले. त्यांची काहीवेळ वाट बघितली असता त्या यायच्याच होत्या. वरिष्ठ अधिकारीच वेळेच्या बाबत उदासीन असल्यामुळे इतर वैद्यकीय अधिकारी वेळ पाळत नसल्याचेही चित्र या ठिकाणी बघायला मिळाले. रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता रुग्णालय की कचरा डेपो हे कळायला मार्ग नव्हता. रुग्णालयाच्या इमारत क्र. १ मध्ये प्रसुती वॉर्ड आहे. त्याच्यापुढे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना भरती ठेवण्यात येते. या दोन्ही इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली होती. या परिसरातून नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाता येत नव्हते. या घाणीचा आणि दुर्गंधीच्या नवजात शिशूसह त्याच्या मातेला सामना करावा लागत होता. इमारतीच्या खिडक्याही घाणीने माखलेल्या अवस्थेत दिसून आल्या. काही रुग्णांशी संवाद साधला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी नियमित होत नाही. त्यामुळे त्याविभागात कार्यरत परिचारिकाच सेवा देण्याचे काम करतात. त्यांच्यावरही कुणाचा वचक नसल्यामुळे त्यांचा रुग्णांशी व्यवहार जेमतेमच असतो. त्यामुळे आपल्या व्यथा कुणाला सांगाव्यात हे कळत नसल्याचे काही रुग्णांनी ‘लोकमत’ चमूशी बोलताना सांगितले.औषधांची खरेदी आता केंद्रीय पद्धतीने होत असल्यामुळे सप्टेंबर ते आॅगस्ट अशी मागणी करण्यात येते. त्यानुसार औषधांना पुरवठा केला जातो, असे सांगण्यात आले. तुटवडा भासल्यास नऊ लाख रुपयांची तरतूद असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे औषधांचा तुटवडा भासत नसल्याचे दिसून आले.(लोकमत न्यूज नेटवर्क)