शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तुम्ही करता, की आम्ही करू? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:15 IST

Wardha news farmer शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे.

ठळक मुद्देवनविभागांचे दुर्लक्ष, पिकांची होतेय नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गकोपात शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झाले. उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांनी थेट चिकणी,जामणी, पढेगाव, सोनेगाव, निमगाव, केळापूर, दहेगावकडे मोर्चा वळविला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी ते करीत आहेत.वन्यप्राण्यांमध्ये रानडुक्कर व रोही यांचे कळप शेतात शिरून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते . एवढेच नव्हे, तर रानडुक्कर संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेक शेतकरी व शेतमजूर जखमी झाले. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे रात्रीची जागली बंद झाली. मजूर शेतात कामावर येताना वन्यप्राण्यांची भीती व्यक्त करतात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचा केव्हा जीव जाईल याचा नेम नाही, जनावरांबरोबर माणसांवरील हल्लेही वाढले आहेत.शासनाने शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळेल अशी व्यवस्था करावी, म्हणजे रात्री जीव धोक्यात घालून ओलित करण्याची वेळ येणार नाही.शेती करण्यासाठी संपूर्ण संरक्षण द्यावे; अन्यथा शेतकरी स्वत:च वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करेल, त्यासाठी वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.शेतीचे नवे संकटनिसर्गाचा लहरीपणा आणि शेतकरी विरोधीधोरणात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला आता वन्यप्राण्यांमुळे नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे . यात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात असल्याने योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

रानडुक्कर, रोही व अन्य वन्यप्राण्यांचे कळप उभे पीक फस्त करीत आहेत. वनविभागाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात शिथिलता आणून शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्याची गरज आहे.- सतीश दाणी, शेतकरी सोनेगाव (आबाजी).

टॅग्स :Farmerशेतकरी