शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तुम्ही करता, की आम्ही करू? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:15 IST

Wardha news farmer शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे.

ठळक मुद्देवनविभागांचे दुर्लक्ष, पिकांची होतेय नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गकोपात शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झाले. उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांनी थेट चिकणी,जामणी, पढेगाव, सोनेगाव, निमगाव, केळापूर, दहेगावकडे मोर्चा वळविला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी ते करीत आहेत.वन्यप्राण्यांमध्ये रानडुक्कर व रोही यांचे कळप शेतात शिरून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते . एवढेच नव्हे, तर रानडुक्कर संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेक शेतकरी व शेतमजूर जखमी झाले. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे रात्रीची जागली बंद झाली. मजूर शेतात कामावर येताना वन्यप्राण्यांची भीती व्यक्त करतात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचा केव्हा जीव जाईल याचा नेम नाही, जनावरांबरोबर माणसांवरील हल्लेही वाढले आहेत.शासनाने शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळेल अशी व्यवस्था करावी, म्हणजे रात्री जीव धोक्यात घालून ओलित करण्याची वेळ येणार नाही.शेती करण्यासाठी संपूर्ण संरक्षण द्यावे; अन्यथा शेतकरी स्वत:च वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करेल, त्यासाठी वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.शेतीचे नवे संकटनिसर्गाचा लहरीपणा आणि शेतकरी विरोधीधोरणात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला आता वन्यप्राण्यांमुळे नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे . यात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात असल्याने योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

रानडुक्कर, रोही व अन्य वन्यप्राण्यांचे कळप उभे पीक फस्त करीत आहेत. वनविभागाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात शिथिलता आणून शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्याची गरज आहे.- सतीश दाणी, शेतकरी सोनेगाव (आबाजी).

टॅग्स :Farmerशेतकरी