शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

साहेब कार्यालयात वेळेवर येतात का? जिल्हा परिषदेकडे १० वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:07 IST

वर्षभरात १५ लाखांचा होतोय खर्च : योजनांच्या अंमलबजावणीसाठी करतात दौरे

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, हे बघण्यासाठी विभागप्रमुखांना दौरे करावे लागतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दहा शासकीय वाहने कार्यरत आहेत. या वाहनांच्या माध्यमातून योजनांच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्याचे काम अधिकारी करीत असतात. 

जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने दिली जातात, वर्धा जिल्हा परिषदेत मोजक्याच अधिकाऱ्यांकडे शासकीय वाहने असून, इतर विभाग हे खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेत असतात. गेल्या अडीच ते तीन वर्षापासून प्रशासक राज असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची वाहने आता अधिकारी किंवा विभागप्रमुखांना देण्यात आली आहे. 

एरवी पदाधिकारी असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींना शासकीय वाहन दिले जातात. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यासह महत्त्वाच्या विभागप्रमुखांनाही शासकीय वाहने दिली जातात. सध्या दहा वाहने उपलब्ध असून, दहाही वाहने अधिकाऱ्यांच्या सेवेत उपलब्ध आहेत. 

वर्षभरात १५ लाखांचा वाहन खर्चजिल्हा परिषदेत दहा शासकीय वाहने असून, त्याकरिता किलोमीटरप्रमाणे वर्षाकाठी इंधन व देखभाल दुरुस्तीकरिता दीड लाखांच्या खर्चाची तरतूद केली जाते. प्रतिवाहन दीड लाखांची तरतूद असल्याने दहा वाहनांवर साधारणतः वर्षाला १५ लाखांचा खर्च होतो. सध्या पदाधिकारी नसल्याने त्यांची वाहने अधिकारी वापरत आहेत. परिणामी, वाहनावरील खर्च या काळात कमी झाला नसून तो कायम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वगळता बांधकाम विभाग, सिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांकरिता खासगी वाहने भाडेत त्त्वावर घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनावर लाखो रुपयांचा खर्च होत असून, काही अधिकाऱ्यांच्या दिमतीला दोन वाहने असल्याचेही चित्र आहे. काही अधिकारी दौऱ्याच्या नावावर वैयक्तिक सैर करण्यातही धन्यता मानत असल्याचे ओरड होत असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

सर्वाधिक वाहने भाडेतत्त्वावर जिल्हा परिषदेचा डोलारा मोठा असल्याने प्रत्येक विभागप्रमुखाला शासकीय वाहन देणे शक्य होत नाही. यामुळे त्यांना खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेऊन दिली जाते. जिल्हा परिषदेत सध्या भाडेत त्त्वावरील वाहने भरमसाठ असून, त्यांच्याकडून नियमाला बगल दिली जात असल्याचे चित्र आहे. या वाहनचालकांनी आपल्या खासगी वाहनावर चक्क 'महाराष्ट्र शासन' असे लिहिले असून, हे नियमबाह्य आहे.

"जिल्हा परिषदेत १० शासकीय वाहने आहेत. यातील काही पदाधिकारी व काही अधिकाऱ्यांसाठी आहे. सध्या पदाधिकारी नसल्याने ती वाहने अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. एका वाहनाकरिता वर्षाकाठी दीड लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये इंधन व देखभाल खर्चाचा समावेश आहे. इतर विभागात खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेतली जातात."-अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जि. प. वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धा