शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

साहेब कार्यालयात वेळेवर येतात का? जिल्हा परिषदेकडे १० वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:07 IST

वर्षभरात १५ लाखांचा होतोय खर्च : योजनांच्या अंमलबजावणीसाठी करतात दौरे

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : ग्रामीण भागाच्या विकासाची गंगोत्री असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते की नाही, हे बघण्यासाठी विभागप्रमुखांना दौरे करावे लागतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दहा शासकीय वाहने कार्यरत आहेत. या वाहनांच्या माध्यमातून योजनांच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्याचे काम अधिकारी करीत असतात. 

जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहने दिली जातात, वर्धा जिल्हा परिषदेत मोजक्याच अधिकाऱ्यांकडे शासकीय वाहने असून, इतर विभाग हे खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेत असतात. गेल्या अडीच ते तीन वर्षापासून प्रशासक राज असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची वाहने आता अधिकारी किंवा विभागप्रमुखांना देण्यात आली आहे. 

एरवी पदाधिकारी असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींना शासकीय वाहन दिले जातात. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यासह महत्त्वाच्या विभागप्रमुखांनाही शासकीय वाहने दिली जातात. सध्या दहा वाहने उपलब्ध असून, दहाही वाहने अधिकाऱ्यांच्या सेवेत उपलब्ध आहेत. 

वर्षभरात १५ लाखांचा वाहन खर्चजिल्हा परिषदेत दहा शासकीय वाहने असून, त्याकरिता किलोमीटरप्रमाणे वर्षाकाठी इंधन व देखभाल दुरुस्तीकरिता दीड लाखांच्या खर्चाची तरतूद केली जाते. प्रतिवाहन दीड लाखांची तरतूद असल्याने दहा वाहनांवर साधारणतः वर्षाला १५ लाखांचा खर्च होतो. सध्या पदाधिकारी नसल्याने त्यांची वाहने अधिकारी वापरत आहेत. परिणामी, वाहनावरील खर्च या काळात कमी झाला नसून तो कायम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वगळता बांधकाम विभाग, सिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांकरिता खासगी वाहने भाडेत त्त्वावर घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनावर लाखो रुपयांचा खर्च होत असून, काही अधिकाऱ्यांच्या दिमतीला दोन वाहने असल्याचेही चित्र आहे. काही अधिकारी दौऱ्याच्या नावावर वैयक्तिक सैर करण्यातही धन्यता मानत असल्याचे ओरड होत असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

सर्वाधिक वाहने भाडेतत्त्वावर जिल्हा परिषदेचा डोलारा मोठा असल्याने प्रत्येक विभागप्रमुखाला शासकीय वाहन देणे शक्य होत नाही. यामुळे त्यांना खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेऊन दिली जाते. जिल्हा परिषदेत सध्या भाडेत त्त्वावरील वाहने भरमसाठ असून, त्यांच्याकडून नियमाला बगल दिली जात असल्याचे चित्र आहे. या वाहनचालकांनी आपल्या खासगी वाहनावर चक्क 'महाराष्ट्र शासन' असे लिहिले असून, हे नियमबाह्य आहे.

"जिल्हा परिषदेत १० शासकीय वाहने आहेत. यातील काही पदाधिकारी व काही अधिकाऱ्यांसाठी आहे. सध्या पदाधिकारी नसल्याने ती वाहने अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. एका वाहनाकरिता वर्षाकाठी दीड लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये इंधन व देखभाल खर्चाचा समावेश आहे. इतर विभागात खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेतली जातात."-अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जि. प. वर्धा

टॅग्स :wardha-acवर्धा