शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

फायनान्स कंपन्या करतात कर्ज वसुलीसाठी गुंडांचा वापर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:18 IST

Vardha : जिल्ह्यात कंपन्यांचा फंडा; दमदाटी करून वसुली, प्रशासनाचे तोंडावर बोट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रशासनाने केलेल्या कठोर नियमावलीमुळे ग्रामीण भागातील सावकारीचा फास कमी होत आहे. मात्र, त्याचा फायदा घेऊन मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागासह वाडी वस्तीवरही हातपाय पसरले आहेत.

अगदी नाममात्र कागदपत्रांत फायनान्स कंपन्यांचे कर्ज सहज उपलब्ध होते. त्यामुळे अनेक तरुण, शेतकरी, मजूर त्यांचे कर्ज घेतात. कर्ज घेताना असलेली नियमावली संबंधितांनी वाचलेली नसती. त्यावर सही केल्यामुळे संबंधित कर्जदार त्यांचा देणेकरी होतो. अनेकजण नियमित पैसेही भरतात. मात्र, काही जणांना परिस्थितीमुळे ते शक्य होतेच असे नाही. त्यांच्या वसुलीसाठी अनेक फायनान्स कंपन्यांनी गुंडांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत दमदाटी करून कर्जाची वसुली केली जात आहे. प्रतिष्ठेमुळे प्रशासनाकडे त्या संदर्भातील तक्रारी अत्यल्प येतात. त्यामुळे संबंधितांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. 

आता याप्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज...मागील १० ते १२ वर्षापासून मायक्रोफायनान्स कंपनीने जिल्ह्यात कर्ज वाटपाचे काम सुरू केले आहे. पूर्वी ग्रामीण भागात कर्ज वाटप करणाऱ्या या कंपन्या मागील चार ते पाच वर्षांपासून शहरातही पाय पसरत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्या ज्या व्याजदराने कर्ज घेतात, त्यावर अधिकाधिक १० टक्के व्याजदर आकारून त्याचे वितरण होणे आवश्यक आहे. मात्र, या कंपन्या यापेक्षाही जास्त दराने व्याज आकारणी करत आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून यावर नियंत्रण मिळवण्याची गरज असून संबंधितांवर कारवाईची आवश्यकता आहे.

हप्ते थकल्यास चक्रवाढ व्याजकंपनीकडून कर्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून संबंधित कर्जदाराकडून धनादेश (चेक) घेतले जातात. ते धनादेश दर महिन्याला वटण्यासाठी बँकेत टाकले जातात. धनादेश वटला नाही तर त्याचे चेक रिटर्न चार्जेस, त्याला लागणारा दंड आदींची वसुली फायनान्स कंपनीकडून केली जातेच. त्याचबरोबर संबंधित कर्जदाराला चक्रवाढ व्याज लावून थकलेल्या रकमेची वसुली केली जाते.

मार्चअखेरमुळे वसुलीवर भरफायनान्स कंपन्यांनी वितरण केलेल्या कर्जाची आकडेवारी कोटीत आहे. त्यांचे भांडवल तेवढे कर्जदारांकडे अडकून असते, ते भांडवल फिरून नवीन कर्जदारांना पैसे देण्यासाठी त्यांना वसुली करणे आवश्यक असते. त्यातच मार्चअखेर असल्याने सध्या साम, दाम, दंड याचा वापर करून फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची वसुली सुरू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून अशा गावगुंडांवर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे.

व्याजदर सारखेच असल्याने घेतात कर्जसंबंधित विविध कंपन्यांचे व्याजदरही सारखेच असतात. त्यामुळे संबंधित लोक मिळेल त्या कंपनीचे कर्ज घेऊन आपली गरज भागवतात, अशी स्थिती शहरासह ग्रामीण भागात आहे. फायनान्सच्या कर्जासाठी फारशी कागदपत्रे घेतली जात नाहीत. मात्र, इंग्रजीत अर्ज असल्यामुळे त्यावर सह्या घेतल्या जातात. अनेकांना त्यात काय लिहिले आहे, याचीही कल्पना नसते.

टॅग्स :wardha-acवर्धाMONEYपैसा