शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

फायनान्स कंपन्या करतात कर्ज वसुलीसाठी गुंडांचा वापर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:18 IST

Vardha : जिल्ह्यात कंपन्यांचा फंडा; दमदाटी करून वसुली, प्रशासनाचे तोंडावर बोट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रशासनाने केलेल्या कठोर नियमावलीमुळे ग्रामीण भागातील सावकारीचा फास कमी होत आहे. मात्र, त्याचा फायदा घेऊन मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागासह वाडी वस्तीवरही हातपाय पसरले आहेत.

अगदी नाममात्र कागदपत्रांत फायनान्स कंपन्यांचे कर्ज सहज उपलब्ध होते. त्यामुळे अनेक तरुण, शेतकरी, मजूर त्यांचे कर्ज घेतात. कर्ज घेताना असलेली नियमावली संबंधितांनी वाचलेली नसती. त्यावर सही केल्यामुळे संबंधित कर्जदार त्यांचा देणेकरी होतो. अनेकजण नियमित पैसेही भरतात. मात्र, काही जणांना परिस्थितीमुळे ते शक्य होतेच असे नाही. त्यांच्या वसुलीसाठी अनेक फायनान्स कंपन्यांनी गुंडांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत दमदाटी करून कर्जाची वसुली केली जात आहे. प्रतिष्ठेमुळे प्रशासनाकडे त्या संदर्भातील तक्रारी अत्यल्प येतात. त्यामुळे संबंधितांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. 

आता याप्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज...मागील १० ते १२ वर्षापासून मायक्रोफायनान्स कंपनीने जिल्ह्यात कर्ज वाटपाचे काम सुरू केले आहे. पूर्वी ग्रामीण भागात कर्ज वाटप करणाऱ्या या कंपन्या मागील चार ते पाच वर्षांपासून शहरातही पाय पसरत आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्या ज्या व्याजदराने कर्ज घेतात, त्यावर अधिकाधिक १० टक्के व्याजदर आकारून त्याचे वितरण होणे आवश्यक आहे. मात्र, या कंपन्या यापेक्षाही जास्त दराने व्याज आकारणी करत आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून यावर नियंत्रण मिळवण्याची गरज असून संबंधितांवर कारवाईची आवश्यकता आहे.

हप्ते थकल्यास चक्रवाढ व्याजकंपनीकडून कर्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून संबंधित कर्जदाराकडून धनादेश (चेक) घेतले जातात. ते धनादेश दर महिन्याला वटण्यासाठी बँकेत टाकले जातात. धनादेश वटला नाही तर त्याचे चेक रिटर्न चार्जेस, त्याला लागणारा दंड आदींची वसुली फायनान्स कंपनीकडून केली जातेच. त्याचबरोबर संबंधित कर्जदाराला चक्रवाढ व्याज लावून थकलेल्या रकमेची वसुली केली जाते.

मार्चअखेरमुळे वसुलीवर भरफायनान्स कंपन्यांनी वितरण केलेल्या कर्जाची आकडेवारी कोटीत आहे. त्यांचे भांडवल तेवढे कर्जदारांकडे अडकून असते, ते भांडवल फिरून नवीन कर्जदारांना पैसे देण्यासाठी त्यांना वसुली करणे आवश्यक असते. त्यातच मार्चअखेर असल्याने सध्या साम, दाम, दंड याचा वापर करून फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची वसुली सुरू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून अशा गावगुंडांवर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे.

व्याजदर सारखेच असल्याने घेतात कर्जसंबंधित विविध कंपन्यांचे व्याजदरही सारखेच असतात. त्यामुळे संबंधित लोक मिळेल त्या कंपनीचे कर्ज घेऊन आपली गरज भागवतात, अशी स्थिती शहरासह ग्रामीण भागात आहे. फायनान्सच्या कर्जासाठी फारशी कागदपत्रे घेतली जात नाहीत. मात्र, इंग्रजीत अर्ज असल्यामुळे त्यावर सह्या घेतल्या जातात. अनेकांना त्यात काय लिहिले आहे, याचीही कल्पना नसते.

टॅग्स :wardha-acवर्धाMONEYपैसा