शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा ‘कायापालट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

शासनाच्या महत्त्वाकांशी असलेल्या ‘कायाकल्प’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा येथील अधिकाऱ्यांनी उचलला आहे. ‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णालयात तब्बल ४.७४ लाखांच्यावर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.

ठळक मुद्देविविध विभागांचा बदलला चेहरा । लाखो रुग्णांना मिळतोय दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा सध्या चेहरा बदलल्याचे बघावयास मिळत आहे. तेथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून ‘स्वच्छ रुग्णालय... उत्तम रुग्णालय’ हे ब्रिद वाक्य प्रत्यक्ष कृतीत उतरवून बापूंना आदरांजली अर्पण केली जात आहे.शासनाच्या महत्त्वाकांशी असलेल्या ‘कायाकल्प’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा येथील अधिकाºयांनी उचलला आहे. ‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णालयात तब्बल ४.७४ लाखांच्यावर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. प्रत्येक गरजूंसह रुग्णाला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्यासह त्यांचे विश्वास संपादीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न असल्याने रुग्णांनाही दिलासा मिळत आहे.पाच वर्षांत १,०५५ गंभीर शस्त्रक्रियाजिल्हा सामान्य रुग्णालयात मागील पाच वर्षांत अनेक किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्या असून याच कालावधीत तब्बल १ हजार ५५ गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रीया करण्यात तेथील वैद्यकीय अधिकाºयांना यश आले आहे.६,०५८ गर्भवती महिलांना दिला उपचारकुपोषणमुक्त वर्धा जिल्हा या दृष्टीने आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसुती विभागाकडून १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत तब्बल ६ हजार ५७ गर्भवती महिलांना चांगली आरोग्य सेवा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून एका गर्भवती महिलेची प्रसुती केली. त्या महिलेने तिळ्यांना जन्म दिलातीनवेळा पटकाविला तृतीय पुरस्कारशासनाच्या महत्त्वाकांशी उपक्रम असलेल्या ‘कायकल्प’ स्पर्धेत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाने यापूर्वी तीन वेळा तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. शिवाय पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम रुग्णालय प्रशासनाने रुग्णसेवेसाठी खर्च केल्याचे सांगण्यात आले.प्रथम पुरस्कारासाठी धडपडकायाकल्प या स्पर्धेत मागील तीन वर्ष सतत तृतीय पुरस्कार पटकाविणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयाने यंदा प्रथम पुरस्कार खेचूनच आणू अशी तयारी केली आहे. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला ५० लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाल्यास पुरस्काराच्या रक्कमेतून आणखी चांगली आरोग्य सेवा देण्याचा मानस तेथील अधिकाºयांचा असल्याचे सांगण्यात येते.शुक्रवारी येणार अधिकाऱ्यांची चमूकायाकल्प या उपक्रमाच्या स्पर्धेत उडी घेतलेल्या वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवांची पाहणी करण्यासाठी शुक्रवार ७ फेब्रुवारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू येत आहे. या चमूतील अधिकारी काही रुग्णांशीही संवाद साधणार असून त्यानंतर ते आपला अभिप्राय वरिष्ठांना सादर करणार आहेत.वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाने यापूर्वी तीन वेळा कायाकल्पचा तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. स्वच्छ रुग्णालय आणि चांगली आरोग्य सेवा देत प्रत्यक्ष कृतीतून आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे.- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य