शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

शेतकरी संघटनेचा जिल्हाकचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:49 IST

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी,

ठळक मुद्देकर्जमाफी फसवीच, आरोप : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघटेनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्यांनी कर्जमाफीच्या विरोधात नारेबाजी करीत वरिष्ठांपर्यंत मागण्या पोहोचविण्यांकरिता जिल्हाधिकाºयांना साकडे घातले.राज्य सरकारला आपल्या सकल राज्य उत्पन्नाच्या २४ टक्के कर्ज उभे करण्याची मुभा असते. महाराष्ट्र राज्यावरील कर्जाच्या बोज्याची मर्यादा सध्या १६.५ टक्केवर पोहोचलेली आहे. तेव्हा कर्जमुक्तीसाठी निधी उभा करण्यास राज्य सरकारला बºयापैकी वाव असल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकºयांचा सातबारा कोरा करावा. कर्जबाजारीपणा व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतमालाला योग्य भाव दिल्या जात नाही. शेतकºयाच्या हितासाठी असलेला स्वामिनाथन आयोग लागू करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातून निघालेल्या मोर्चाने दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. मोर्चाचे नेतृत्त्व माजी आमदार सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाधिकाºयांना निवदेन देवून मोर्चाचा समारोप करण्यात आला.आंदोलनात गंगाधर मुटे, संध्या राऊत, सचिन डाफे, शैलजा देशपांडे, मधुसुदन हरणे, सतीश दाणी, गजानन निकम, पांडुरंग भालशंकर, निळकंठ घवघवे, सुभाष बोकडे, नंदु काळे, प्रभाकर झाडे, धोंडबा गावंडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अन्यथा उपोषणमोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना मंगळवारी सादर करण्यात आले. निवेदनात नमुद असलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने येत्या काही दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास ३ सप्टेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.शेतकरी विरोधी धोरणाचा निषेधहुतात्मा स्मारक परिसरात एकत्र झालेल्या शेतकरी व आंदोलनकर्त्यांना मोर्चा पूर्वी माजी आमदार सरोज काशीकर, गंगाधर मुटे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर ताशेरे ओढले. तसेच कुठलीही अट न लावता राज्यातील सर्वच शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली.