शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

फसवणूक झालेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून द्यावे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

२०१४-१५ मध्ये टालाटुले बंधूंनी खरेदी केलेल्या २० हजार क्विंटल कापसाचा मोबदला मिळावा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी किसान अधिकार अभियानच्या नेतृत्त्वात धडक दिली. कापसाचे पैसे मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, पण अद्यापही मोबदला मिळालेला नाही. मध्यंतरी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. २०१६ मध्ये एक रिट पिटीशन टाकून शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या पैशाची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार पेठ असलेल्या सेलू बाजारपेठेत सुनील टालाटुले आणि अतुल टालाटुले यांनी ४०० शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला, पण या शेतकऱ्यांना कापसाचे पैसे देण्यात आले नाहीत. या प्रकरणी मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान फसगत झालेल्या शेतकऱ्यांची बाजू किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी मांडली. फसवणूक झालेल्या ४०० शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वत: पुढाकार घेऊन त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी केली.२०१४-१५ मध्ये टालाटुले बंधूंनी खरेदी केलेल्या २० हजार क्विंटल कापसाचा मोबदला मिळावा म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी किसान अधिकार अभियानच्या नेतृत्त्वात धडक दिली. कापसाचे पैसे मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, पण अद्यापही मोबदला मिळालेला नाही. मध्यंतरी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. २०१६ मध्ये एक रिट पिटीशन टाकून शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या पैशाची मागणी केली. तेव्हा जुलै २०१८ मध्ये २० ऑगस्ट २०१८ पर्यंत शेतकऱ्यांचे थकलेले कापूस चुकाऱ्याचे पैसे टालाटुले बंधूंनी द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. शिवाय दिलेल्या मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास जिल्हाधिकारी यांनी महसुली वसुलीच्या नियमानुसार टालाटुले बंधूंच्या संपत्तीचा लिलाव करावा, असा आदेशही दिला. असे असले तरी २०१८ पासून अद्याप जिल्हा प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेतली नाही.  त्यानंतर कोर्टाची अवमानना याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यामध्ये तहसीलदार सेलू व जिल्हाधिकारी वर्धा यांच्यावर  अवमानना याचिका उच्च न्यायालय नागपूर येथे सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २७ ऑक्टोबर २०२१ ला त्यांच्या संपत्तीचा लिलाव केला. २७ ऑक्टोबर २०२१ ला टालाटुले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिलाव रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली. लिलाव रद्द करण्याबाबत केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली आहे, तर आता २४ नोव्हेंबर २०२१ ला जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे त्यांनी ठरलेला लिलाव रद्द करण्याबाबत एक शपथपत्र सादर केले व त्याची सुनावणी मंगळवारी, ३० नोव्हेंबरला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सुनावणीदरम्यान अविनाश काकडे, मोहन सोनूरकर, सुदाम पवार व शेतकऱ्यांची बाजू ॲड. रवी बोबडे यांनी मांडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्धा यांनी महाठगबाज टालाटुले बंधूंकडून शेतकऱ्यांचे हक्काचे कापसाचे पैसे मिळू द्यावे, अशी विनंती करण्यात आली. यावेळी फसवणूक झालेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी