शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

जिल्ह्यात ७०८ दिवे बंदावस्थेत

By admin | Updated: December 6, 2014 22:52 IST

अपारंपरिक उर्जा स्त्रोतांना बळकटी देण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने आठही तालुक्यातील ५१७ ग्रामपंचायतींकरिता सौरउर्जेवर चालणारे २ हजार ४४ पथदिवे मंजूर केले. यावर जि.प.चे लाखो रुपये खर्च झाले.

५२७ ग्रा.पं.मध्ये लावले २,०४४ सौरदिवेवर्धा : अपारंपरिक उर्जा स्त्रोतांना बळकटी देण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने आठही तालुक्यातील ५१७ ग्रामपंचायतींकरिता सौरउर्जेवर चालणारे २ हजार ४४ पथदिवे मंजूर केले. यावर जि.प.चे लाखो रुपये खर्च झाले. मात्र आजच्या घडीला या दिव्यांखाली अंधारच असल्याचे चित्र गावागावांत आहे. या पथदिव्यांपैकी आजच्या घडीला ७०८ दिवे बंद असून केवळ १,३३८ दिवे सुरू असल्याने जि.प. पैसा वाया गेल्याची चर्चा आहे. वीजेचे दर वाढत असल्याने ग्रामपंचायतींना त्यांचा भरणा करणे कठीण जाते. शिवाय मध्यंतरी अपारंपरिक उर्जेचे बळकटीकरण करण्याच्या शासनाकडून सूचना आल्या होत्या. यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने विविध फंडाच्या माध्यमातून आठही तालुक्यातील ग्रामपंचायतींना सौरउर्जेवर चालणारे दिवे देण्याचा निर्णय घेतला. यावर परिषदेच्यावतीने एक रक्कमही निश्चित करण्यात आली. यानुसार सर्वच ग्रामपंचायतीत एकूण दोन हजार ४४ दिवे मंजूर लावण्यात आले; मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे पथदिवे बंदावस्थेत आहेत. दिवे बंद असल्याने अपारंपरिक उर्जेचे बळकटीकरण करण्याच्या योजनेसह ग्रामपंचायतींना बसणारा वीज देयकाचा फटका कमी करण्याच्या योजनेला पुरता विराम लागला आहे. या दिव्याच्या बॅटऱ्या व सोलर पॅनल चोरी गेल्याने ते बंद असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)