५२७ ग्रा.पं.मध्ये लावले २,०४४ सौरदिवेवर्धा : अपारंपरिक उर्जा स्त्रोतांना बळकटी देण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने आठही तालुक्यातील ५१७ ग्रामपंचायतींकरिता सौरउर्जेवर चालणारे २ हजार ४४ पथदिवे मंजूर केले. यावर जि.प.चे लाखो रुपये खर्च झाले. मात्र आजच्या घडीला या दिव्यांखाली अंधारच असल्याचे चित्र गावागावांत आहे. या पथदिव्यांपैकी आजच्या घडीला ७०८ दिवे बंद असून केवळ १,३३८ दिवे सुरू असल्याने जि.प. पैसा वाया गेल्याची चर्चा आहे. वीजेचे दर वाढत असल्याने ग्रामपंचायतींना त्यांचा भरणा करणे कठीण जाते. शिवाय मध्यंतरी अपारंपरिक उर्जेचे बळकटीकरण करण्याच्या शासनाकडून सूचना आल्या होत्या. यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने विविध फंडाच्या माध्यमातून आठही तालुक्यातील ग्रामपंचायतींना सौरउर्जेवर चालणारे दिवे देण्याचा निर्णय घेतला. यावर परिषदेच्यावतीने एक रक्कमही निश्चित करण्यात आली. यानुसार सर्वच ग्रामपंचायतीत एकूण दोन हजार ४४ दिवे मंजूर लावण्यात आले; मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे पथदिवे बंदावस्थेत आहेत. दिवे बंद असल्याने अपारंपरिक उर्जेचे बळकटीकरण करण्याच्या योजनेसह ग्रामपंचायतींना बसणारा वीज देयकाचा फटका कमी करण्याच्या योजनेला पुरता विराम लागला आहे. या दिव्याच्या बॅटऱ्या व सोलर पॅनल चोरी गेल्याने ते बंद असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ७०८ दिवे बंदावस्थेत
By admin | Updated: December 6, 2014 22:52 IST