शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

लॉकडाऊन काळात पाेस्टबॅंकेकडून १२ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:37 IST

Wardha News post bank लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे.

ठळक मुद्देबॅंका, एटीएम बंद असताना पोस्ट बॅंकेने घरपोच सेवा देत पैशांचे केले वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ३३ हजार ५०० नागरिकांना तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचे घरपोच वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.लॉकडाऊनच्या काळात अनेक वित्तसंस्था आपल्या अस्तित्वासाठी झगडत होते. तसेच या वित्तसंस्था व बॅंकांना व्यवसाय विस्तार कसा होणार हा यक्षप्राश्न बॅंकांपुढे पडला होता. या परिस्थितीतही पोस्ट पेमेंट्स बॅंकेची ही कामगिरी प्रशंसेला पात्र ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणावर बॅंक खाती उघडण्यात आल्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक आता आधार संलग्न असलेल्या कोणत्याही बॅंक खात्यासाठी आंतरबॅंक सेवा पुरवणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणून उदयाला येत आहे. घरपोच रोकड नेण्यासाठी जिल्ह्यातील २८० पोस्टमन राबत आहे. यासाठी जिल्ह्यातील १५६ पोस्ट कार्यालये कामाला लागली आहेत.

घरपोच रोकड पोहचविताना पोस्टमन बोटांच्या ठशांवरुन संबंधित ग्राहकांची ओळख पटवून घेतली. तसेच कंटेन्मेंट झोन, स्थलांतरितांचे कॅम्प, हॉटस्पॉट, आजारी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना त्यांची रोकड आधार आधारित पेमेंट सेवेमार्फत दिल्या गेली. लॉकडाऊन काळात एकीकडे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना पोस्टबॅंकेद्वारा पोस्टमनच्या मदतीने नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचवून दिल्याचे काम केल्याने कोरोना काळात पोस्टमन यांनी कोरोना योद्धांचे कार्य केले.

पाच हजार विद्यार्थ्यांनी उघडली खाती

कोरोना काळात सर्वच व्यवहार बंद होते. बॅंका देखील बंद होत्या. अनेक विद्यार्थ्यांंना आपले खाते उडायचे होते. अशातच पोस्ट बॅंकेद्वारा नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचविण्याचे काम केले असून या संकट काळात ५ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खाती उघडण्यात आली आहे.

औषधांसह राख्याही पोचता केल्या घरपोच

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झाले होते. सर्वत्र जिल्हाबंदी होती. अशातच राखीसण आल्याने अनेक बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राखी बांधता आली नाही. तसेच कोरोना काळ सुरु असल्याने कुणी यायलाही तयार नव्हते. अशावेळी अनेकांनी राख्या या पोस्टाने पाठविल्या. या संकट काळातही पोस्टमनने घरोघरी जात राख्या पोहचवून दिल्या. तसेच अनेकांनी औषधी देखील पोस्टाद्वारो पाठविली होती. ती सुद्धा नियोजित स्थळी पोहचवून देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कोरोना काळात पोस्टमन हे खरे कोरोना योद्धा ठरल्याचे एकंदरित पहावयास मिळते.

कोरोना काळात पोस्टबॅंकेद्वारा जिल्ह्यातील २८० पोस्टमनद्वारा ३३ हजार ५०० नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना घरपोच रोकड नेऊन देत सेवा दिली तसेच राखी सणानिमित्त राखी, आणि औषधांचीही पाेेस्टमन यांनी घरपोच सेवा दिली.

अविनाश अवचट

पोस्टमास्टर, मुख्य डाकघर

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस