शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लॉकडाऊन काळात पाेस्टबॅंकेकडून १२ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:37 IST

Wardha News post bank लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे.

ठळक मुद्देबॅंका, एटीएम बंद असताना पोस्ट बॅंकेने घरपोच सेवा देत पैशांचे केले वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ३३ हजार ५०० नागरिकांना तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचे घरपोच वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.लॉकडाऊनच्या काळात अनेक वित्तसंस्था आपल्या अस्तित्वासाठी झगडत होते. तसेच या वित्तसंस्था व बॅंकांना व्यवसाय विस्तार कसा होणार हा यक्षप्राश्न बॅंकांपुढे पडला होता. या परिस्थितीतही पोस्ट पेमेंट्स बॅंकेची ही कामगिरी प्रशंसेला पात्र ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणावर बॅंक खाती उघडण्यात आल्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक आता आधार संलग्न असलेल्या कोणत्याही बॅंक खात्यासाठी आंतरबॅंक सेवा पुरवणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणून उदयाला येत आहे. घरपोच रोकड नेण्यासाठी जिल्ह्यातील २८० पोस्टमन राबत आहे. यासाठी जिल्ह्यातील १५६ पोस्ट कार्यालये कामाला लागली आहेत.

घरपोच रोकड पोहचविताना पोस्टमन बोटांच्या ठशांवरुन संबंधित ग्राहकांची ओळख पटवून घेतली. तसेच कंटेन्मेंट झोन, स्थलांतरितांचे कॅम्प, हॉटस्पॉट, आजारी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना त्यांची रोकड आधार आधारित पेमेंट सेवेमार्फत दिल्या गेली. लॉकडाऊन काळात एकीकडे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना पोस्टबॅंकेद्वारा पोस्टमनच्या मदतीने नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचवून दिल्याचे काम केल्याने कोरोना काळात पोस्टमन यांनी कोरोना योद्धांचे कार्य केले.

पाच हजार विद्यार्थ्यांनी उघडली खाती

कोरोना काळात सर्वच व्यवहार बंद होते. बॅंका देखील बंद होत्या. अनेक विद्यार्थ्यांंना आपले खाते उडायचे होते. अशातच पोस्ट बॅंकेद्वारा नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचविण्याचे काम केले असून या संकट काळात ५ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खाती उघडण्यात आली आहे.

औषधांसह राख्याही पोचता केल्या घरपोच

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झाले होते. सर्वत्र जिल्हाबंदी होती. अशातच राखीसण आल्याने अनेक बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राखी बांधता आली नाही. तसेच कोरोना काळ सुरु असल्याने कुणी यायलाही तयार नव्हते. अशावेळी अनेकांनी राख्या या पोस्टाने पाठविल्या. या संकट काळातही पोस्टमनने घरोघरी जात राख्या पोहचवून दिल्या. तसेच अनेकांनी औषधी देखील पोस्टाद्वारो पाठविली होती. ती सुद्धा नियोजित स्थळी पोहचवून देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कोरोना काळात पोस्टमन हे खरे कोरोना योद्धा ठरल्याचे एकंदरित पहावयास मिळते.

कोरोना काळात पोस्टबॅंकेद्वारा जिल्ह्यातील २८० पोस्टमनद्वारा ३३ हजार ५०० नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना घरपोच रोकड नेऊन देत सेवा दिली तसेच राखी सणानिमित्त राखी, आणि औषधांचीही पाेेस्टमन यांनी घरपोच सेवा दिली.

अविनाश अवचट

पोस्टमास्टर, मुख्य डाकघर

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस