शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

लॉकडाऊन काळात पाेस्टबॅंकेकडून १२ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:37 IST

Wardha News post bank लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे.

ठळक मुद्देबॅंका, एटीएम बंद असताना पोस्ट बॅंकेने घरपोच सेवा देत पैशांचे केले वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ३३ हजार ५०० नागरिकांना तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचे घरपोच वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.लॉकडाऊनच्या काळात अनेक वित्तसंस्था आपल्या अस्तित्वासाठी झगडत होते. तसेच या वित्तसंस्था व बॅंकांना व्यवसाय विस्तार कसा होणार हा यक्षप्राश्न बॅंकांपुढे पडला होता. या परिस्थितीतही पोस्ट पेमेंट्स बॅंकेची ही कामगिरी प्रशंसेला पात्र ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणावर बॅंक खाती उघडण्यात आल्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक आता आधार संलग्न असलेल्या कोणत्याही बॅंक खात्यासाठी आंतरबॅंक सेवा पुरवणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणून उदयाला येत आहे. घरपोच रोकड नेण्यासाठी जिल्ह्यातील २८० पोस्टमन राबत आहे. यासाठी जिल्ह्यातील १५६ पोस्ट कार्यालये कामाला लागली आहेत.

घरपोच रोकड पोहचविताना पोस्टमन बोटांच्या ठशांवरुन संबंधित ग्राहकांची ओळख पटवून घेतली. तसेच कंटेन्मेंट झोन, स्थलांतरितांचे कॅम्प, हॉटस्पॉट, आजारी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना त्यांची रोकड आधार आधारित पेमेंट सेवेमार्फत दिल्या गेली. लॉकडाऊन काळात एकीकडे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना पोस्टबॅंकेद्वारा पोस्टमनच्या मदतीने नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचवून दिल्याचे काम केल्याने कोरोना काळात पोस्टमन यांनी कोरोना योद्धांचे कार्य केले.

पाच हजार विद्यार्थ्यांनी उघडली खाती

कोरोना काळात सर्वच व्यवहार बंद होते. बॅंका देखील बंद होत्या. अनेक विद्यार्थ्यांंना आपले खाते उडायचे होते. अशातच पोस्ट बॅंकेद्वारा नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचविण्याचे काम केले असून या संकट काळात ५ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खाती उघडण्यात आली आहे.

औषधांसह राख्याही पोचता केल्या घरपोच

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झाले होते. सर्वत्र जिल्हाबंदी होती. अशातच राखीसण आल्याने अनेक बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राखी बांधता आली नाही. तसेच कोरोना काळ सुरु असल्याने कुणी यायलाही तयार नव्हते. अशावेळी अनेकांनी राख्या या पोस्टाने पाठविल्या. या संकट काळातही पोस्टमनने घरोघरी जात राख्या पोहचवून दिल्या. तसेच अनेकांनी औषधी देखील पोस्टाद्वारो पाठविली होती. ती सुद्धा नियोजित स्थळी पोहचवून देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कोरोना काळात पोस्टमन हे खरे कोरोना योद्धा ठरल्याचे एकंदरित पहावयास मिळते.

कोरोना काळात पोस्टबॅंकेद्वारा जिल्ह्यातील २८० पोस्टमनद्वारा ३३ हजार ५०० नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना घरपोच रोकड नेऊन देत सेवा दिली तसेच राखी सणानिमित्त राखी, आणि औषधांचीही पाेेस्टमन यांनी घरपोच सेवा दिली.

अविनाश अवचट

पोस्टमास्टर, मुख्य डाकघर

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस