शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण

By admin | Updated: June 2, 2014 01:40 IST

परिवहन विभागाच्या बसगाड्यांची दैनावस्था व मार्गावर असलेल्या बसच्या

वर्धा : परिवहन विभागाच्या बसगाड्यांची दैनावस्था व मार्गावर असलेल्या बसच्या कमी फेर्‍या यामुळे वर्धा-कापसी मार्गे राळेगाव या रस्त्यावर काळी-पिवळी व ऑटोरिक्षा चालकांना जोर आला आहे. वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करण्यात येत आहे. याची माहिती वाहतूक व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांना असून त्यांच्याकडून यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. वाहनात कोंबून प्रवासी भरण्याच्या या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वर्धा ते कापसी मार्गावर धावणार्‍या काळी-पिवळी चालकांनी नियम पुरते हद्दपार केले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक काळी-पिवळीमधून केली जाते. बसायला जागा असली तरी गाडीच्या पाठीमागे असलेल्या पायदानावर चार ते पाच प्रवासी उभे करून जीवघेणी प्रवासी वाहतूक केली जात आहे. याशिवाय ऑटोलाचकाच्या शेजारी बसवून प्रवाशांची जीवघेणी वाहतूक करण्याची शर्यत सध्या या मार्गावर सुरू आहे. तब्बल सात ते नऊ प्रवासी कोंबून धावणार्‍या ऑटोरिक्षा सर्रास दिसून येतात. या वाहनांकडे पाहिल्यावर यात बसणार्‍या प्रवाशांची कीव आल्याशिवाय राहत नाही. यातही या वाहनांची गती एवढी अधिक असते की समोरून येणार्‍या वाहन चालकाला त्याचा अंदाज येत नाही. यात अपघात होण्याची शक्यता अधिक आाहे.

वर्धा-कापसी मार्गावर वायगाव येथील पोलीस चौकी सोडली तर समोर कुठेही पोलीस नसल्याने ही वाहतूक बिनदिक्कत चालत असल्याचे बोलले जात आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे या मार्गावरून आवागमन करणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडत असताना याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)