शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत साडेचौदा हजार मेट्रीक टन तांदळाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST

दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात ४ हजार ७७१ मेट्रीक टन, मे महिन्यात ४ हजार ८३५ तर जून महिन्यात ४ हजार ९४७ मेट्रीक टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. या तिन्ही महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदूळ मोफत मिळाला असून आता या तांदळाची दहा रुपये प्रतिकि लो किंवा दोन किलो तांदळाच्या मोबदल्यात एक किलो ज्वारी, या पद्धतीने नियमबाह्य विक्री सुरु झाली आहे.

ठळक मुद्देगरीब कल्याण योजना : गावोगावी लाभार्थ्यांकडूनच होताहेत विक्री, विनापरवानाधारक व्यापारी ग्रामीणसह शहरी भागातही सक्रीय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. हाताला काम नसल्याने धान्यकोंडी होण्याची शक्यता बळावली होती. त्यामुळे सर्वांना दोन वेळेचे जेवण मिळावे म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गट कुटुंबांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे आठही तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यात १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदळाचा वाटप करण्यात आला. पण, लाभार्थ्यांनी या मोफतच्या तांदळाची विक्री सुरु केल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये एकूण ८५३ स्वस्त धान्याची दुकाने असून जिल्ह्यातील १० लाख ७३ हजार १९२ लाभार्थ्यांना नियमित धान्यासोबतच मोफतच्या पाच किलो तांदळाचाही लाभ देण्यात आला आहे. यात ८ लाख ६१ हजार ४५८ लाभार्थी प्राधान्य गट तर २ लाख ०३ हजार ७३४ लाभार्थी अंत्योदय गटातील आहे.एप्रिल महिन्यांपासून पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना तांदळाचे मोफत वितरण करण्यात आले आहे. या दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यात ४ हजार ७७१ मेट्रीक टन, मे महिन्यात ४ हजार ८३५ तर जून महिन्यात ४ हजार ९४७ मेट्रीक टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. या तिन्ही महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना १४ हजार ५५३ मेट्रीक टन तांदूळ मोफत मिळाला असून आता या तांदळाची दहा रुपये प्रतिकि लो किंवा दोन किलो तांदळाच्या मोबदल्यात एक किलो ज्वारी, या पद्धतीने नियमबाह्य विक्री सुरु झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा कुठलाही परवाना नसलेले व्यापारी गावागावात सक्रीय झाले आहे. बऱ्याच लाभार्थ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच तांदळाची विक्री सुरु केल्याचे बोलेले जात आहे.लाभार्थ्यांकडून खरेदी केलेले हेच तांदूळ फिल्टर करुन २५ ते ३० रुपये दराने खुल्या बाजारात विकल्या जात आहे. आता पाच किलो तांदळाऐवजी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतल्याने आता तांदळा सोबतच गव्हाचीही लाभार्थ्यांकडून विक्री होण्याची शक्यता असल्याने शासकीय धान्याचा हा गैरवापर थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.१४ जणांचे परवाने निलंबितकार्डधारकांना वेळेवर धान्य न देणे, लाभार्थ्यांच्या वाट्यापेक्षा कमी धान्य देणे अशा असंख्य तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या. या तक्रारीच्या आधारे चौकशी करुन एप्रिल महिन्यात ६, मे महिन्यात ३ तर जून महिन्यात ५ अशा एकूण १४ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. ते दुकान दुसºयाला हस्तांतरीत करुन नियमित धान्यवाटप सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.शासनाकडून आता पाच किलो तांदळाऐवजी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिले जात आहे. तांदळाची काही लाभार्थ्यांकडून विक्री होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे कार्डधारकांकडून अवैधरित्या धान्य खरेदी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल. त्यादृष्टीने आम्ही कारवाईला प्रारंभही केलेला आहे.रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या