शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गात असंतोष

By admin | Updated: April 24, 2016 02:18 IST

प्रतिनियुक्तीवरील पदांवर तदर्थ पदोन्नती कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदावनत करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

 जिल्हा कृषी अधीक्षकांना कृषी सेवा महासंघाद्वारे निवेदन : टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा इशारावर्धा : प्रतिनियुक्तीवरील पदांवर तदर्थ पदोन्नती कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदावनत करण्याचे धोरण राबविण्यात येत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळे २०-२५ वर्षानंतर पदोन्नती झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे म्हणत त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सनदशीर मार्गाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय कृषी सेवा महासंघाने घेतलेला असून त्याबाबतचे निवेदन महासंघाच्या जिल्हा शाखेद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांना देण्यात आले. कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहे, यामध्ये प्रामुख्याने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) ची पदे व्यापगत न करता या संस्थेचे बळकटीकरण करण्यात यावे. (वनामती नागपूर) स्तरावरील संचालक-चार पदे, उपसंचालक (अकृअ संवर्ग) आठ पदे तसेच जिल्हास्तरावरील प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय कायम ठेवून प्रकल्प संचालक (अकृअ संवर्ग) ३३ पदे, प्रकल्प उपसंचालक ६६ इत्यादी प्रतिनियुक्तीची पदे कायम करण्यात यावीत.कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या वनामती (समिती) नागपूर व संलग्न ८ समिती वा प्रशिक्षण संस्था सामान्य प्रशासन विभागाकडे हस्तांतरीत न करता या संस्था कृषी विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणात आणव्यात. या संस्थामधील प्रतिनियुक्तीची पदे तदर्थ पदोन्नतीने कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून भरण्यात यावी. कृषिमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करण्यात यावी. नाशिक संभाग व अन्य संभागातील कृषी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे कृषी पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदांवर पदोन्नती देणेबाबत विभागीय कृषी सहसंचालन यांना आदेश व्हावेत. कृषी अधिकारी (मकृसे गट-ब कनिष्ठ) संवर्गातील ३५३ रिक्त पदे कृषी पर्यवेक्षक संवर्गातून पदोन्नतीने भरण्याची प्रलंबित प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी.बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला यांचा सुधारित आकृतिबंध शासननिर्णय ३० जून २०१५ अन्वये व्यपगत केलेली मकृसे गट-अ संवर्गातील-३ पदे, कृषी अधिकारी (मकृसे गट-ब कनिष्ठ) संवर्गातील-१६५ पदे, कृषी पर्यवेक्षक संवर्गातील - ८ पदे पुनर्जीवित करण्यात यावी आणि सदर पदे कृषी विभागातून तदर्थ पदोन्नतीद्वारे भरण्यात यावीत.कृषी विभागातील मंजूर आकृतिबंधाव्यतिरिक्त अन्य योजनेतील यंत्रणेतील विभागातील मंजूर प्रतिनियुक्तीची पदे तदर्थ पदोन्नती कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून कायमस्वरूपी भरण्यात यावी, जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यासाठी स्वतंत्र पदे मंजूर करण्यात यावी अन्यथा या योजनेचा प्रगती अहवाल सादर करण्याचे काम अन्य विभागास सोपविण्यात यावे. तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची समकक्षता पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व दर्जाशी समकक्ष करण्यात येऊन मकृसे वर्ग-२ संवर्गास वर्ग-१ राजपत्रित दर्जा व कृषी अधिकारी मकृसे (गट-ब कनिष्ठ) संवर्गास नियमित वर्ग-२ राजपत्रित दर्जा देण्यात यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याची जबाबदारी तलाठ्यांची असल्याने यात कृषी सहायकास जबाबदार धरले जाऊ नये. जलसंधारण आयुक्तालय औरंगाबादचे प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रण कृषी विभागाकडे देणे. कृषी विभागाच्या काही योजना जि.प.कडे हस्तांतरीत करण्याबाबतचा निर्णय रद्द करणे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. शिष्टमंडळात तालुका कृषी अधिकारी ब्राह्मणे, कृषी अधिकारी शेळके, सूर्यकांत चौधरी, कृषी उपसंचालक जी.आर. कापसे, तंत्र अधिकारी राजेश चनशेट्टी, राधिका बैरागी, मयुरी झोरे, मेघा पाटील, तालुका कृषी अधिकरी राठोड उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)