शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
2
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
3
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
4
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
5
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
6
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
7
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
8
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
9
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
10
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
11
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
12
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
13
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
14
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
15
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
16
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
17
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
18
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
19
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
20
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!

पाटचऱ्या नादुरूस्त, शेती कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:12 IST

खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकातून खर्चही निघत नसल्याने न खचता शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे लक्ष दिले आहे;....

ठळक मुद्देअनेकांच्या रखडल्या पेरण्या : दुरूस्तीबाबत पाटबंधारे विभाग उदासीनच

आॅनलाईन लोकमतवर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकातून खर्चही निघत नसल्याने न खचता शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे लक्ष दिले आहे; पण पाटचºयांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहोचत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अद्याप पेरण्याही आटोपता आल्या नसल्याचे वास्तव आहे. कालवे, उपकालवे, पाटचºया, सायपण यांच्या दुरूस्तीबाबत पाटबंधारे विभाग अत्यंत उदासिन असल्याचेच दिसून येत आहे.सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांतून रबी हंगामाकरिता पाणी सोडण्यात आले आहे. उर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, बोरधरण, महाकाली आदी प्रकल्पांतून कालव्यांच्या माध्यमातून पाणी दिले आहे; पण दयनिय कालवे, उपकालवे व पाटचºयांमुळे ते पाणी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच नाही. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पेरण्याही करता आलेल्या नाहीत. यामुळे रबी हंगामातील पिके तरी शेतकºयांना आधार देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.पाटाचे पाणी शेतात कधी पोहोचणार? संतप्त शेतकऱ्यांचा सवालघोराड - दहा दिवसांपूर्वी बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामाकरिता सोडण्यात आले आहे; पण पाण्याची झुळ-झुळ गती ओलिताकरिता त्रासदायक ठरत आहे. यामुळे शेती कधी तयार होणार आणि पेरणी कधी करावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.बोर प्रकल्पाच्या पाण्यावर सेलू व समुद्रपूर तालुक्यातील काही भागाचा रबी हंगाम अवलंबून असतो; पण वेळीच वितरिकांची साफसफाई केली जात नसल्याने शेतात पाणीच पोहोचत नाही. अनेक भागातील सफाई अर्धवट असून ती नावपूरतीच केली. यामुळे वितरिकेद्वारे पाणी कमी सोडले जाते. परिणामी, शेताच्या बांधापर्यंत पाणी पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. यात शेतकºयांची आपसातच भांडणे लागत असल्याचे दिसते. ‘पाणी हेच जीवन आहे’ असे म्हटले जाते; पण पाटाच्या पाण्याचे नियोजनच केले जात नाही. यासाठी कर्मचारीही नाही. रोजंदारी कर्मचारी वितरिकेवर दिसत नाहीत. पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. पांदण रस्ते जलमय होतात. नदी, नाल्यांचा प्रवाह वाढला आहे; पण टोकापर्यंत पाणी पोहोचून पेरणी कधी होणार, हा प्रश्न कायम राहत आहे.पांदण रस्त्यांवर चिखलसेलू तालुक्यातील कालवे, उपकालवे, पाटचºया, सायपण यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, कालव्यातील पाणी शेतात पोहोचण्याऐवजी पांदण रस्त्याने वाहत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक पांदण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरते. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे चित्र आहे.कर्मचारीही बेपत्ताचकालव्यांतील पाणी उपकालवे, वितरिकांमध्ये सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे कायम कर्मचारी नाही. हे काम रोजंदारी कामगारांकडून करून घेतले जाते; पण सेलू तालुक्यात रोजंदारी कर्मचारीही वितरिकांजवळ दिसून येत नसल्याने पाण्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह लागले आहे. वरिष्ठांनी हा भोंगळ कारभार दूर करणे गरजेचे झाले आहे.निम्न वर्धाचे कालवेच अर्धवटसिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली; पण २५ ते ३० वर्षांचा कालावधी लोटला असताना या प्रकल्पाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही. निम्न वर्धा प्रकल्पातील मुख्य डावा कालवाच अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आले तर पुलगाव शहरातील तथा नाचणगाव आणि अन्य ग्रामीण भागातील कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही. अद्याप कालवाच पूर्ण झाला नाही तर उपकालवे आणि पाटचऱ्यांची निर्मिती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.परिणामी, या कालव्यात पाणी तर सोडण्यात आले; पण ते आपल्या शेतात पोहोचविण्याकरिता शेतकºयांना कालव्यावरच मोटर पंप बसवावे लागत आहे. हा प्रकार कोल्हापूर (राव), भिडी तथा परिसरातील गावांमध्ये पाहावयास मिळतो. कालवाच पूर्ण झाला नसल्याने उपकालवे, पाटचऱ्यांची निर्मिती पाटबंधारे विभागाकडून कधी केली जाणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. निम्न वर्धा प्रकल्प विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.