शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

पाटचऱ्या नादुरूस्त, शेती कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:12 IST

खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकातून खर्चही निघत नसल्याने न खचता शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे लक्ष दिले आहे;....

ठळक मुद्देअनेकांच्या रखडल्या पेरण्या : दुरूस्तीबाबत पाटबंधारे विभाग उदासीनच

आॅनलाईन लोकमतवर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी पिकातून खर्चही निघत नसल्याने न खचता शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे लक्ष दिले आहे; पण पाटचºयांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहोचत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अद्याप पेरण्याही आटोपता आल्या नसल्याचे वास्तव आहे. कालवे, उपकालवे, पाटचºया, सायपण यांच्या दुरूस्तीबाबत पाटबंधारे विभाग अत्यंत उदासिन असल्याचेच दिसून येत आहे.सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांतून रबी हंगामाकरिता पाणी सोडण्यात आले आहे. उर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, बोरधरण, महाकाली आदी प्रकल्पांतून कालव्यांच्या माध्यमातून पाणी दिले आहे; पण दयनिय कालवे, उपकालवे व पाटचºयांमुळे ते पाणी अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच नाही. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पेरण्याही करता आलेल्या नाहीत. यामुळे रबी हंगामातील पिके तरी शेतकºयांना आधार देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.पाटाचे पाणी शेतात कधी पोहोचणार? संतप्त शेतकऱ्यांचा सवालघोराड - दहा दिवसांपूर्वी बोर प्रकल्पाचे पाणी रबी हंगामाकरिता सोडण्यात आले आहे; पण पाण्याची झुळ-झुळ गती ओलिताकरिता त्रासदायक ठरत आहे. यामुळे शेती कधी तयार होणार आणि पेरणी कधी करावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.बोर प्रकल्पाच्या पाण्यावर सेलू व समुद्रपूर तालुक्यातील काही भागाचा रबी हंगाम अवलंबून असतो; पण वेळीच वितरिकांची साफसफाई केली जात नसल्याने शेतात पाणीच पोहोचत नाही. अनेक भागातील सफाई अर्धवट असून ती नावपूरतीच केली. यामुळे वितरिकेद्वारे पाणी कमी सोडले जाते. परिणामी, शेताच्या बांधापर्यंत पाणी पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. यात शेतकºयांची आपसातच भांडणे लागत असल्याचे दिसते. ‘पाणी हेच जीवन आहे’ असे म्हटले जाते; पण पाटाच्या पाण्याचे नियोजनच केले जात नाही. यासाठी कर्मचारीही नाही. रोजंदारी कर्मचारी वितरिकेवर दिसत नाहीत. पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. पांदण रस्ते जलमय होतात. नदी, नाल्यांचा प्रवाह वाढला आहे; पण टोकापर्यंत पाणी पोहोचून पेरणी कधी होणार, हा प्रश्न कायम राहत आहे.पांदण रस्त्यांवर चिखलसेलू तालुक्यातील कालवे, उपकालवे, पाटचºया, सायपण यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, कालव्यातील पाणी शेतात पोहोचण्याऐवजी पांदण रस्त्याने वाहत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक पांदण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरते. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत असल्याने त्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे चित्र आहे.कर्मचारीही बेपत्ताचकालव्यांतील पाणी उपकालवे, वितरिकांमध्ये सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे कायम कर्मचारी नाही. हे काम रोजंदारी कामगारांकडून करून घेतले जाते; पण सेलू तालुक्यात रोजंदारी कर्मचारीही वितरिकांजवळ दिसून येत नसल्याने पाण्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह लागले आहे. वरिष्ठांनी हा भोंगळ कारभार दूर करणे गरजेचे झाले आहे.निम्न वर्धाचे कालवेच अर्धवटसिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून निम्न वर्धा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली; पण २५ ते ३० वर्षांचा कालावधी लोटला असताना या प्रकल्पाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही. निम्न वर्धा प्रकल्पातील मुख्य डावा कालवाच अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आले तर पुलगाव शहरातील तथा नाचणगाव आणि अन्य ग्रामीण भागातील कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही. अद्याप कालवाच पूर्ण झाला नाही तर उपकालवे आणि पाटचऱ्यांची निर्मिती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.परिणामी, या कालव्यात पाणी तर सोडण्यात आले; पण ते आपल्या शेतात पोहोचविण्याकरिता शेतकºयांना कालव्यावरच मोटर पंप बसवावे लागत आहे. हा प्रकार कोल्हापूर (राव), भिडी तथा परिसरातील गावांमध्ये पाहावयास मिळतो. कालवाच पूर्ण झाला नसल्याने उपकालवे, पाटचऱ्यांची निर्मिती पाटबंधारे विभागाकडून कधी केली जाणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. निम्न वर्धा प्रकल्प विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.