शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

जखमींवरील उपचारात व आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत खोडा

By admin | Updated: July 6, 2016 02:25 IST

खरांगणा आणि आंजी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर राहत नसल्याने किरकोळ व गंभीर जखमींवर उपचार होत नाही.

पोलीस यंत्रणा हतबल : डॉक्टर अवैध रजेवरआकोली : खरांगणा आणि आंजी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर राहत नसल्याने किरकोळ व गंभीर जखमींवर उपचार होत नाही. यामुळे वैद्यकीय तपासणीत अडथळा निर्माण होतो. सदर आरोपींना सामान्य रुग्णालय वर्धा येथे नेल्यास डॉक्टर वैद्यकीय तपासणी करून देण्यास नकार देतात. यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली आहे.वर्धा-आर्वी व खरांगणा-कारंजा मार्गावर नेहमी अपघात होतात. अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित व वेळीच उपचार मिळणे अत्यावश्यक असते; पण खरांगणा येथे रात्रपाळीत कुणी राहत नाही. शिवाय दिवसाही मिटींग वा अन्य कारणाने डॉक्टर गैरहजर असतात. परिणामी, जखमींना आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जाते; पण तेथील दोन्ही डॉक्टर अवैध रजेवर आहेत. प्रभारीवर इतर ठिकाणचा भार असल्याने दवाखाना नेहमी डॉक्टरविना असतो. यात जखमींवर त्वरित उपचार होत नसल्याची ओरड जनता व पोलीस यंत्रणेकडे होत आहे. भांडणातील जखमी फिर्यादी व आरोपींची वैद्यकीय तपासणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. वैद्यकीय तपासणी शिवाय पूढील कायदेशीर कार्यवाही करणे अडचणीचे असते. खरांगणा व आंजी (मोठी) येथील दवाखान्यात डॉक्टर गैरहजर राहत असल्याने वैद्यकीय तपासणीसाठी संबंधितांना सामान्य रुग्णालयात पोलीस घेऊन जातात; पण तेथील डॉक्टर ज्या हद्दीत घटना घडली, तेथेच वैद्यकीय तपासणी करा, आम्ही करून देणार नाही, अशी भूमिका घेतात. डॉक्टरांची नकारघंटा कायदेशीर योग्य असली तरी पोलिसांच्या कार्यवाहीत अडचणी निर्माण करणारी ठरते. पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेत त्रासाबद्दल माहिती दिली असता डॉक्टरांचा नकार योग्य असल्याचे त्यांनी बोलून दाखविल्याचे पीएसआय विनोद राऊत यांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी जखमींना घेऊन कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.(वार्ताहर)