शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आधी केली जेवणाची व्यवस्था, आता धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने जिल्हा प्रशासनाला विनंती करून एका निवारात असलेल्या बाहेरगावच्या कष्टकरी बांधवांना जेवण वितरणाच्या जबबादारी घेतली. आता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रत्यक्ष जेवण देण्याचे नियाजन सध्या शक्य नाही. मात्र, नागरिकांनी दिलेल्या योगदानाचा विनियोग गरजू बांधवांसाठी होणे गरजेचे असल्याने शहरालगतच्या किंवा शहरापासून काही अंतरावर शेतात,......

ठळक मुद्देगुरुजींच्या आवाहनाला वर्धेकरांची साद : म.रा.प्रा. शिक्षक समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी बाहेर जिल्ह्यातील मजूर अडकून पडले आहे. प्रशासनाकडून त्यांची निवारागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. अशा आश्रित कष्टकरी बांधवांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला वर्धेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता शिक्षण समितीकडून जेवणाची व्यवस्था पूर्ण करीत गरजूंना धान्य वाटपाचा कार्यक्रमही हाती घेतला आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने जिल्हा प्रशासनाला विनंती करून एका निवारात असलेल्या बाहेरगावच्या कष्टकरी बांधवांना जेवण वितरणाच्या जबबादारी घेतली. आता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रत्यक्ष जेवण देण्याचे नियाजन सध्या शक्य नाही. मात्र, नागरिकांनी दिलेल्या योगदानाचा विनियोग गरजू बांधवांसाठी होणे गरजेचे असल्याने शहरालगतच्या किंवा शहरापासून काही अंतरावर शेतात, रस्त्याच्या कडेला असणारे ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, पाल टाकून राहणारे व शिधापत्रिका नसल्याने कोणतीही मदत मिळाली नसल्याने भटकंती करणारे किंवा निराश्रित, निराधार, दिव्यांग आणि अजूनही ज्यांच्यापर्यंत अद्यापही कोणतीही मदत पोहोचली नाही, अशांची खात्रीशीर माहिती घेऊन जीवनावश्यक विविध वस्तूंची कीट पुरविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामध्ये गव्हाचे पिठ ५ किलो, तांदूळ ५ किलो, तूर डाळ १ किलो, चणा डाळ १ किलो, खाद्य तेल १ लीटर, साखर २ किलो, तिखट ५०० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, मीठ १ किलो, चहापत्ती १२५ ग्रॅम, साबण पावडर ५०० ग्रॅम, स्नानाची साबण १, कपडे धुण्याची साबण या वस्तूंचा समावेश आहे. ही एक किट ८३३ रुपयाची आहे. या किट तयार करण्याचे काम सुरु असून त्या गरजूंपर्यंत पोहोचविल्या जात आहे. गुुरुवारी रात्री सेवाग्राम मांडगाव मार्गावर ऊसतोडणी कामगार ७ आणि बंद असलेल्या वीट भट्टीवरील ८ गरजू अशा १५ कष्टकरी कुटूंबीयांना वस्तू वितरित करण्यात आल्या. गरजू कुटुंबीयांना आवश्यक वस्तू देण्यापूर्वी त्या परिसरातील परिचित मंडळी आणि शिक्षक बांधव तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, युवकांना विचारणा करून आणि मदत पोहोचली नसल्याची खात्री झाल्यानंतरच वितरण केल्या जात आहे. 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक