शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईला पदरिक्ततेचा खोडा

By admin | Updated: June 11, 2014 23:25 IST

‘ठंडा पाणी पाऊच पाच में दो’, अशी हाक प्रवासादरम्यान नेहमीच ऐकायला मिळते. गळ्यात थर्माकॉलची पेटी आणि हातात एक दोन पाणी पाऊच घेवून विकणारी मुले बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसरात हमखास

जागतिक बालकामगार दिन : वर्षभरात शोधला केवळ एक बालकामगारश्रेया केने - वर्धा‘ठंडा पाणी पाऊच पाच में दो’, अशी हाक प्रवासादरम्यान नेहमीच ऐकायला मिळते. गळ्यात थर्माकॉलची पेटी आणि हातात एक दोन पाणी पाऊच घेवून विकणारी मुले बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसरात हमखास नजरेस पडतात. बालकांना शिक्षण देवून त्यांचे बाल्य खुरटले जाणार नाही या दृष्टिकोनातून शासनाने बालकामगार विरोधी अधिनियम तयार केला. यात दंडाची व शिक्षेची तरतूदही केली. मात्र अंमलबजावणी अभावी या नियमाला आस्थापनाधारकांकडून तिलांजली दिली जात आहे. जिल्ह्यातही पदरिक्ततेमुळे कारवाई करण्यात अडसर येत असून गत वर्षभरात केवळ एकाच बालकामगाराचे पुनर्वसन करण्यात आले आहे. १२ जून हा दिवस जगभरात बालकामगार दिन म्हणून पाळण्यात येतो. परिस्थितीअभावी घराकरिता काहीतरी कमावण्याची जबाबदारी या बालकांच्या खांद्यावर येवून त्यांचे बाल्य श्रमातच व्यथित होवू नये याकरिता शासन विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्नरत असते. मोफत शिक्षण, माध्यान्ह भोजन या योजनेद्वारे बालकांना त्यांचा हक्क मिळवून दिला जातो. देशभरात विविध आस्थापना, उपहारगृह, बांधकाम कंपनी येथे ही लहानगी मुले राबताना दिसतात. कमी वेतनात अधिक श्रम या बालकांकडून करवून घेतले जाते. त्यामुळे त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण होत होते

या प्रकाराला प्रतिबंध घालण्याकरिताच शासनाने १९८६ साली ‘चाईल्ड लेबर अ‍ॅक्ट’ अस्तित्वात आणला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कामगार कार्यालयाकडे देण्यात आली. यात ‘कृती दल’ तयार करून कारवाईचा अधिकार दिला. पण कारवाईचे वावडे असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून नेहमीच याबाबतीतही असंवेदनशिलतेचा प्रत्यय येतो. जिल्ह्यात कामगार विभागातील एकून आठ पदांपैकी पाच पदे रिक्त असल्याने कारवाई करण्यात मोठा अडसर येत आहे. याशिवाय जागृतीचा अभाव असल्याने सर्रास बालकामगार विविध उपहारगृहे व आस्थापनात दिवसरात्र राबताना दिसतात. कचरा वेचणारी, भंगार गोळा करणारी, पाणी पाऊचची विक्री, चहाटपरी येथे काम करणाऱ्या बालमजुरांची तर गणतीच नाही. उन्हाळ्यात तर शाळांना सुटी असल्याने आपल्या कुटुंबाला ‘हातभार’ म्हणून अनेक मुले कामाच्या शोधात असतात. आपल्याकरिता शासनाने भरीव अनुदान व योजना तयार केल्या आहेत. याचा मागमुसही या मुलांना नसतो. त्या कामातच या बालकांचे बालपण हिरावले जाते. जिल्ह्यात सामाजिक संस्थांचाही यात पुढाकार तुलनेने कमी असल्याने कुणालाही याचे सोयर सुतक नसावे, अशीच अवस्था आहे.