शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जिल्हा प्रशासन अन् पोर्टलवरील आकडेवारीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

सोमवार, दि. १७ मे रोजी वर्धा जिल्ह्यात नवीन ३०० कोविडबाधित सापडल्याचे तसेच तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आणि ५६२ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याचे संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय १ हजार १४७ कोविड चाचण्या करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे; तर याचदिवशी जिल्हा प्रशासनाकडून मागील २४ तासांत जिल्ह्यात ८८१ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर ११० नवीन कोविडबाधित सापडल्याचे व त्यापैकी आठ कोविडबाधित जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखऱ्या आकडेवारीबाबत नागरिकांकडून उपस्थित होताहेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात कोरोनाची एन्ट्री झाल्यापासून प्रत्येक कोविड बाधितासह कोरोनामुक्त तसेच कोविड मृतांची नोंद प्रशासन घेत आहे. शिवाय ती माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपडेट केली जात आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीत आणि संकेत स्थळावरून जाहीर होत असलेल्या आकडेवारीत मोठी तफावत येत असल्याने नेमकी खरी माहिती कुठली, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे.सोमवार, दि. १७ मे रोजी वर्धा जिल्ह्यात नवीन ३०० कोविडबाधित सापडल्याचे तसेच तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आणि ५६२ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याचे संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय १ हजार १४७ कोविड चाचण्या करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे; तर याचदिवशी जिल्हा प्रशासनाकडून मागील २४ तासांत जिल्ह्यात ८८१ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर ११० नवीन कोविडबाधित सापडल्याचे व त्यापैकी आठ कोविडबाधित जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर एकाचदिवशी ३५० व्यक्ती कोविडमुक्त झाले. तसेच कोरोनामुळे १८ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापैकी तीन व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच संकेतस्थळ आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या माहितीत तफावत येत असल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोविड बाधितांच्या आकडेवारीत तफावर येत असल्याने आरोग्य विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

कोविडमुक्त झालेत किती?nसोमवारपर्यंत जिल्ह्यातील ३८ हजार ९५५ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले; पण याचदिवशी संकेतस्थळावर ४६ हजार २६१ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोविडमुक्त किती व्यक्ती झालेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चाचण्यांच्या आकडेवारीत तफावत- सोमवारपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार ३२९ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावर सोमवारपर्यंत वर्धा जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ९२५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे.

मृतांच्या आकडेवारीत ३५० ने फरकसोमवार, दि. १७ मे रोजीपर्यंत जिल्ह्यातील १ हजार १५५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावर केवळ ८०५ कोविड मृतांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे संकेतस्थळावरील माहिती तातडीने आणि वेळोवेळी अपडेट करण्याची गरज आहे.

कोविडबाधितांच्या संख्येतही फरक- जिल्हा प्रशासनाने सोमवारपर्यंत जिल्ह्यातील ४४ हजार ४८३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद घेतली आहे. असे असले तरी, संकेतस्थळावर ५३ हजार ३१४ कोविड बाधितांची नोंद असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू