शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

शासकीय बांधकाम प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांतच मतभेद

By admin | Updated: November 1, 2015 02:38 IST

राज्य शासनाच्या जागेवर न.प. मुख्याधिकारी, बांधकाम सभापती आणि व्यावसायिकांच्या संगनमताने शासकीय परवानगी न घेता पक्के बांधकाम करण्यात आले.

प्रश्नोत्तराचे सत्र सुरू : संगामताने निर्णयआर्वी : राज्य शासनाच्या जागेवर न.प. मुख्याधिकारी, बांधकाम सभापती आणि व्यावसायिकांच्या संगनमताने शासकीय परवानगी न घेता पक्के बांधकाम करण्यात आले. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यातच मतभेद असल्याचे समोर आले आहे. या दोन अधिकाऱ्यांमध्ये पत्रोपत्री प्रश्नोत्तराचे सत्र सुरू झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.या अवैध बांधकामाबाबत एका नागरिकाने थेट पोलीस ठाण्यातच तक्रार दिली आहे. यावर आता जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मौजा आर्वी शेत क्र. २६ या राज्य शासनाच्या जागेवर चार व्यावसायिकांनी पक्के बांधकाम केले. चौकशी न करता या बांधकामास मुख्याधिकारी यांनी परवानगी दिली. ही जागा शासनाची असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी न घेता चार व्यावसायिकांनी पक्के बांधकाम केल्याने याबाबत पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत प्रतीक शुक्ला, दीपक देशमुख, मेघराज डोंगरे आदी नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यात; पण पालिका प्रशासनाने या बाबींकडे दुर्लक्ष केले. संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मेघराज डोंगरे यांनी ८ सप्टेंबर २०१५ रोजी केली. त्यानुसार मंडळ अधिकारी, तलाठी, न.प. मुख्याधिकारी यांना तहसीलदार यांनी अहवाल मागवून वरिष्ठांकडे सादर केला. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून २१ आॅक्टोबर २०१५ रोजी तहसीलदार यांना पत्र पाठविण्यात आले. यात शेत सर्व्हे क्र. १६ या जागेवर मुख्याधिकारी, बांधकाम समितीचे पदाधिकारी आणि व्यावसायिकांच्या संगनमताने शासनाची परवानगी न घेता पक्के बांधकाम केल्याबद्दल गुन्हे दाखल करावे, कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.तहसीलदार यांनी २६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या पत्रानुसार या जागेच्या मालकी हक्काची पडताळणी न.प. मुख्याधिकारी यांनी न करताच परवानगी दिली. व्यावसायिकांनी जागेच्या मालकी हक्काबाबत बांधकाम परवानगीव्यतिरिक्त दुसरी कुठलीही कागदपत्रे सादर केली नाहीत, असा अहवाल तहसीलदार यांनी वरिष्ठांना सादर केला. याबाबत ६ आॅक्टोबरच्या निर्देशाप्रमाणे आपण केलेल्या चौकशीअंती संबंधितांवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक होते; पण आपण कारवाई केल्याचे दिसून येत नाही. याबाबत खुलासा सादर करावा व संबंधितांवर तत्काळ कारवाई करून अहवाल विनाविलंब सादर करावा, असे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली. या प्रकरणात संबंधित व्यावसायिकांना नोटीस पाठवून बयाणाकरिता बोलविले होते. बांधकामधारकांनी जागेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर केली नाहीत. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून कारवाई होण्याकरिता अहवाल सादर केल्याचे पत्रही वरिष्ठांना पाठविले. याबाबत नगर पालिकेला आपण निर्देश द्यावेत, अशी विनंती तहसीलदार यांनी पत्राद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांना केली आहे. त्याची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांना सादर केली. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यात काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)