शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

शासकीय बांधकाम प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांतच मतभेद

By admin | Updated: November 1, 2015 02:38 IST

राज्य शासनाच्या जागेवर न.प. मुख्याधिकारी, बांधकाम सभापती आणि व्यावसायिकांच्या संगनमताने शासकीय परवानगी न घेता पक्के बांधकाम करण्यात आले.

प्रश्नोत्तराचे सत्र सुरू : संगामताने निर्णयआर्वी : राज्य शासनाच्या जागेवर न.प. मुख्याधिकारी, बांधकाम सभापती आणि व्यावसायिकांच्या संगनमताने शासकीय परवानगी न घेता पक्के बांधकाम करण्यात आले. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यातच मतभेद असल्याचे समोर आले आहे. या दोन अधिकाऱ्यांमध्ये पत्रोपत्री प्रश्नोत्तराचे सत्र सुरू झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.या अवैध बांधकामाबाबत एका नागरिकाने थेट पोलीस ठाण्यातच तक्रार दिली आहे. यावर आता जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मौजा आर्वी शेत क्र. २६ या राज्य शासनाच्या जागेवर चार व्यावसायिकांनी पक्के बांधकाम केले. चौकशी न करता या बांधकामास मुख्याधिकारी यांनी परवानगी दिली. ही जागा शासनाची असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी न घेता चार व्यावसायिकांनी पक्के बांधकाम केल्याने याबाबत पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत प्रतीक शुक्ला, दीपक देशमुख, मेघराज डोंगरे आदी नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यात; पण पालिका प्रशासनाने या बाबींकडे दुर्लक्ष केले. संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मेघराज डोंगरे यांनी ८ सप्टेंबर २०१५ रोजी केली. त्यानुसार मंडळ अधिकारी, तलाठी, न.प. मुख्याधिकारी यांना तहसीलदार यांनी अहवाल मागवून वरिष्ठांकडे सादर केला. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून २१ आॅक्टोबर २०१५ रोजी तहसीलदार यांना पत्र पाठविण्यात आले. यात शेत सर्व्हे क्र. १६ या जागेवर मुख्याधिकारी, बांधकाम समितीचे पदाधिकारी आणि व्यावसायिकांच्या संगनमताने शासनाची परवानगी न घेता पक्के बांधकाम केल्याबद्दल गुन्हे दाखल करावे, कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.तहसीलदार यांनी २६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या पत्रानुसार या जागेच्या मालकी हक्काची पडताळणी न.प. मुख्याधिकारी यांनी न करताच परवानगी दिली. व्यावसायिकांनी जागेच्या मालकी हक्काबाबत बांधकाम परवानगीव्यतिरिक्त दुसरी कुठलीही कागदपत्रे सादर केली नाहीत, असा अहवाल तहसीलदार यांनी वरिष्ठांना सादर केला. याबाबत ६ आॅक्टोबरच्या निर्देशाप्रमाणे आपण केलेल्या चौकशीअंती संबंधितांवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक होते; पण आपण कारवाई केल्याचे दिसून येत नाही. याबाबत खुलासा सादर करावा व संबंधितांवर तत्काळ कारवाई करून अहवाल विनाविलंब सादर करावा, असे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली. या प्रकरणात संबंधित व्यावसायिकांना नोटीस पाठवून बयाणाकरिता बोलविले होते. बांधकामधारकांनी जागेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर केली नाहीत. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून कारवाई होण्याकरिता अहवाल सादर केल्याचे पत्रही वरिष्ठांना पाठविले. याबाबत नगर पालिकेला आपण निर्देश द्यावेत, अशी विनंती तहसीलदार यांनी पत्राद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांना केली आहे. त्याची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांना सादर केली. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यात काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)