शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

धोची वाळूघाटातील पाण्याचा प्रवाहच वळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:21 IST

हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष्यात धोका होण्याची शक्यताही बळावली आहे.

ठळक मुद्देवाळूमाफियांचा धुडगूस : दोन बोटींच्या सहाय्याने होतोय अवैध उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/पोहणा : हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष्यात धोका होण्याची शक्यताही बळावली आहे.पहिल्या टप्प्यात झालेल्या आठ घाटांच्या लिलावापैकी हा एक वाळू घाट असून या घाटाची सर्वाधिक बोली लागली. आठही घाटाच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५१ रुपयांचा महसूल मिळाला. त्यापैकी तब्बल २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयांचा महसूल एकट्या धोची वाळूघाटाने दिला आहे. या घाटात सर्वांत जास्त ६ हजार १८४ ब्रास वाळू असल्याचा अंदाज ठरविण्यात आला होता.त्यामुळे जास्त वाळूसाठा असल्याने आतापर्यंतच्या वाळूघाटाच्या लिलावाच्या इतिहासात पहिल्यांच बोली अडीच कोटींवर गेली. हा घाट आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्टस् लि. या कंपनीच्या नावाने असून येथून वाळू उपसा करण्याचा कंत्राट बुरांडे व साटोणे नामक व्यक्तींनी घेतल्याचे नुकताच घडलेल्या घटनेवरून उघडकीस आले आहे. वाळूउपसा करण्याचा कंत्राट घेणाऱ्यांनी या नदीपात्रात नियमबाह्य दोन बोटी लावून दिवस-रात्र वाळूउपसा चालविला.परिणामी, नदीपात्रही धोक्यात आले. गावातून वाहतूक बंद करण्याकरिता नागरिकांनी वाहने अडविल्याने झालेल्या चाकू हल्ल्यानंतर प्रशासनालाही जाग आली. त्यांनी लगेच घाटाकडे धाव घेत बोटी जप्त करण्याच्या कारवाईसाठी धडपड चालविली.महसूल-पोलीस प्रशासनाने मिटलेय डोळेलिलावानंतरच्या काळात वाळू उपस्यावर बंदी आली होती. ती बंदी उठवून अटी व शर्तीच्या अधिन राहून वाळूउपसा करण्याचे निर्देश घाटधारकांना दिले होते. परंतु, अद्याप घाटधारकांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे धोची घाटावरील प्रकारावरून निदर्शनास आले आहे. बोटी व जड वाहनांना घाटात प्रवेश निषिद्ध असतानाही या घाटात राजरोसपणे नियम धाब्यावर बसवून वाळूउपसा सुरू होता. परंतु, आतापर्यंत याकडे हिंगणघाटच्या महसूल विभागाचे आणि पोलिसांचेही कसे लक्ष गेले नाही, हे न उलगडणारे कोडेच आहे.आता तरी प्रशासनाला जाग येईल का?वाळूघाटातून वाळू भरून निघालेल्या जड वाहनांमुळे गावकऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे गावकºयांनी दुसºया मार्गाने वाहतूक करा, असे सांगण्याकरिता वाहने अडविली, तर त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी मुजोर घाटधारक बुरांडे याने त्यांच्यावर चाकू हल्ला करून ज्ञानेश्वर इंगळे याला जखमी केले. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूघाटधारक गावकºयांच्या जिवावर उठले आहेत, त्यामुळे आता तरी कठोर कारवाई करणार काय? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.हल्लेखोराला अटकवाळूघाटधारक आकाश उर्फ अक्षय दिनेश बुरांडे रा. धानोरा याला वडनेर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, असे ठाणेदार गजभिये यांनी सांगितले.