शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करु नये

By admin | Updated: August 12, 2016 01:44 IST

राज्यात १ कोटी ४ लाख आदिवासी बांधव आहेत. प्रत्येक मतदारसंघात खऱ्या आदिवासींची लोकसंख्या अधिक असुन मतदारांची संख्याही जास्त आहे.

मागणी : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवेदन वर्धा : राज्यात १ कोटी ४ लाख आदिवासी बांधव आहेत. प्रत्येक मतदारसंघात खऱ्या आदिवासींची लोकसंख्या अधिक असुन मतदारांची संख्याही जास्त आहे. आदिवासी जमातीमध्ये इतर जमातींना समाविष्ठ करून आदिवासींचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. अनुसूचित जमातीत धनगर समाजाचा समावेश करु नये, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यावतीने निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी निवेदन स्वीकारले. धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा देणे, अनुसूचित जमातीत समाविष्ट करणे ही आदिवासींच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारी व अन्यायकारक बाब आहे. शासनसेवेत खऱ्या आदिवासींच्या हक्काच्या ९७ हजार नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यावर १८ मे २०१३ चा शासन निर्णय काढण्यात आला. पण त्याची अंमलबजावणी केली नाही. अशा बोगस आदिवासींची दुसरी पिढी कार्यरत असून आदिवासींच्या सवलतींचा ते फायदा घेत आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट केल्यास मूळ आदिवासी प्रगतीपासुन वंचित राहतील. मुळात धनगर समाज सधन आहे. शेळ्या-मेंढ्या पालनाचा व्यवसाय आहे. आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेत त्यांची कुठेही सांगड बसत नाही. भारतीय संविधानाच्या ३४२ कलमात कोण अनुसूचित जाती व जमातीत आहे हे भारतीय घटनेने ठरविले आहे. त्यांची जीवनपध्दती, भौगोलिक क्षेत्र, परिस्थिती असे वैशिष्ट्ये जे पूर्ण करतात त्यांची यादी घटनेनुसार प्रसिध्द झाली आहे. त्यात धनगर समाजाचा उल्लेख आढळत नाही. धनगर समाज ओ.बी.सी. मध्ये समाविष्ठ होता. ओबीसीतुन वगळून एन.टी मध्ये समाविष्ट करुन आता एस.टी. मध्ये समाविष्ट करण्याचा उहापोह सुरू आहे. असा आरोप निवेदनातून करण्यात आला असून यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)