शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

भूमिगत जलवाहिनीद्वारे ‘धाम’चे पाणी येणार वर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:09 IST

यंदाच्या वर्षी वर्धा शहरासह शहराशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनी टाकून वर्धेसह वर्धा शहराशेजारील नागरिकांसाठी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल........

ठळक मुद्दे‘मजिप्रा’ला डीपीआर तयार करण्याच्या सचिवांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी वर्धा शहरासह शहराशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनी टाकून वर्धेसह वर्धा शहराशेजारील नागरिकांसाठी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या आहेत.धाम प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा न.प. प्रशासन त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १६ हजार कुटुंबियांना तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागातील सुमारे १७ हजार कुटुंबियांना पाणी पुरवठा करते. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने त्याला कसा आळा घालता येईल हे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होते. मंगळवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी पार पडलेल्या विशेष बैठकीत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सदर सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर तो मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी बनकर, जि.प. सिंचन विभागाचे गहलोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता वाघ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गवळी, वर्धा पाटबंधारे विभागाचे एस. बी. काळे तसेच सर्व न.प.चे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्र्यांनी १५ सरपंचांशी साधला संवादसदर बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी, आष्टी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील १५ सरपंचाशी थेट संवाद साधला. यावेळी सरपंचांनी मुख्यमंत्री दरबारी आपल्या विविध मागण्या रेटल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरपंचांच्या सदर मागण्या पूर्णत्त्वास जाण्यासाठी काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल संबंधित अधिकाºयांनी ४८ तासात सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.गाळमुक्त धामविषयी चर्चाच नाहीभविष्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी धाम गाळमुक्त होणे गरजेचे आहे. परंतु, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत महाकाळी येथील धाम प्रकल्प गाळमुक्त होण्यासाठी काय कार्यवाही केली जात आहे. तो किती दिवसांत गाळमुक्त होईल या विषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. तर बैठकीदरम्यान धामच्या उंची वाढीचा विषयाची माहिती प्रधान सचिव चहल यांना देण्यात आली. राज्य तांत्रिक सल्लागार समितीने काढलेल्या त्रुट्यांची पुर्तता सध्या केली जात असल्याचे यावेळी चहल यांना अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई