शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

विकास शुल्क; पालिकेचे कोट्यवधी पाण्यात

By admin | Updated: May 12, 2014 00:02 IST

नगर परिषदेच्या हद्दीत कुठलेही बांधकाम करावयाचे झाल्यास तत्सम परवानगी घ्यावी लागते़ यासाठी संबंधितांना जागेचा नकाशा, मोजमाप, बांधकामाचे स्वरूप, घरगुती की व्यावसायिक ...

प्रशांत हेलोंडे - ं नगर परिषदेच्या हद्दीत कुठलेही बांधकाम करावयाचे झाल्यास तत्सम परवानगी घ्यावी लागते़ यासाठी संबंधितांना जागेचा नकाशा, मोजमाप, बांधकामाचे स्वरूप, घरगुती की व्यावसायिक आदी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात़ शिवाय पालिकेला विकास शुल्कही अदा करावे लागते़ या सर्व भानगडीत न पडता सध्या सर्रास बांधकामे उरकली जात आहेत़ पालिकाही दुर्लक्ष करीत असल्याने कोट्यवधी रुपयांचे विकास शुल्क बुडत आहे़ ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे़ चार वर्षांत पालिकेचा सरासरी १० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे़ वर्धा शहरात सध्या बांधकामांना मोठाच उत आला आहे़ जागोजागी बांधकामे सुरू असल्याचे दिसून येते़ यातील बहुतांश बांधकामांसाठी परवानगीच घेतल्याचे आढळत नाही़ पालिकेकडे २००९ व २०१० या दोन वर्षांत ५० बांधकामांच्या परवानगीचे अर्ज प्राप्त झाले होते़ पालिकेने या सर्व बांधकामांना परवानगी देत विकास शुल्क वसूल करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ प्राप्त ५० अर्जांपैकी केवळ २९ बांधकामांना मंजुरी देत विकास शुल्काची आकारणी करण्यात आली़ उर्वरित २१ बांधकामे पालिकेने रोखली, अशातलाही भाग नाही़ ती सर्व बांधकामे पूर्ण झालीत; पण संबंधित घर वा दुकान मालकांकडून पालिकेला कुठलेही विकास शुल्क वसूल करता आलेले नाही़ असाच प्रकार प्रत्येक वर्षी झाल्याचे पालिकेमधील रेकॉर्ड तपासले असता दिसून येते़ आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी माहिती अधिकारात ही माहिती प्राप्त केली आहे़ यातही पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळच केली जात असल्याचाही त्यांचा अनुभव आहे़ २०१२ व २०१३ या दोन वर्षांत पालिकेकडे शहरातील ७६ बांधकामांचे अर्ज प्राप्त झालेत़ हे बांधकाम करणार्‍यांकडून पालिकेला सुमारे ५ ते १० लाख रुपयांचे विकास शुल्क वसूल करता आले असते; पण केवळ १५ बांधकामांना मंजुरी देऊन विकास शुल्क आकारण्यात आले़ शिवाय ५ बांधकाम करणार्‍यांकडून मंजुरी न देताच विकास शुल्क घेण्यात आले़ २०१२-१३ मध्ये २० बांधकाम करणार्‍यांकडून ४ लाख १५ हजार ५९१ रुपये विकास शुल्क वसूल करण्यात आले़ केवळ २० बांधकामांतून पालिकेला ४ लाखांवर विकास शुल्क मिळविता आले़ मग, उर्वरित ५६ बांधकामांतून शुल्क का वसूल करण्यात आले नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे़ पालिकेमध्ये मंजुरीसाठी सादर केलेल्या नकाशे व अन्य कागदपत्रांत कधी त्रुट्या निघत नाहीत, हे विशेष! पालिकेद्वारे चार वर्षांत केवळ दोनच बांधकामांना त्रुटीपत्र देण्यात आले़ त्यातही सदर बांधकामे रोखली वा पाडली, असे झाले नाही़ २००९-१० मध्येही पालिकेने केवळ २९ बांधकाम करणार्‍यांकडून ३ लाख १२ हजार २५७ रुपयांचे विकास शुल्क वसूल करण्यात आले़ शिवाय चार वर्षांत केवळ १२६ घर वा दुकानांचेच शहरात बांधकाम झाले असेल, हे कुणीही मान्य करणार नाही़ शहरात जर या चार वर्षांत ३०० बांधकामे झाली असतील तर उर्वरित १६४ लोकांना पालिकेच्या परवानगीची गरजही वाटली नाही, असेच दिसते़ मंजुरी न घेता पालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र, वीज जोडणी, नळ जोडणी उपलब्ध होत असल्याने नागरिक बांधकामास परवानगी घेत नसल्याचे नगर अभियंते फरसोले यांनी सांगितले़ या सुविधा रोखल्यास परवानगीचे अर्ज वाढतील व पालिकेलाही विकास शुल्क वसूल करता येईल; पण वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचे दिसते़ नियमानुसार बांधकामांना मंजुरी दिल्यास पालिकेला वर्षाकाठी किमान १० लाख रुपयांचे विकास शुल्क मिळू शकते; पण पालिका ते करीत नसल्याचे दिसते़ विकास शुल्काबाबत सुमारे १० ते १२ वर्षांचा रेकॉर्ड तपासल्यास बहुतांश बांधकामे मंजूरच नसल्याचे दर्शविले आहे़ पालिका प्रशासनाने हे शुल्क वसूल केल्यास शहर विकासात मदत होऊ शकेल़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़