शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

केळझरात विकास कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:18 IST

विदर्भाचा सिद्धीविनायक असलेल्या केळझर नगरीत सध्या शासनाच्या विविध योजनातून विकास कामे अतिशय वेगाने सुरू आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले असल्याने येथील गणेश मंदिर, धम्मभूमी व दर्गाह परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआमदारांकडून कामाची पाहणी : पीरबाबा दर्गाह परिसरात कामे प्रगतीवर

ऑनलाईन लोकमतवर्धा : विदर्भाचा सिद्धीविनायक असलेल्या केळझर नगरीत सध्या शासनाच्या विविध योजनातून विकास कामे अतिशय वेगाने सुरू आहे. राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले असल्याने येथील गणेश मंदिर, धम्मभूमी व दर्गाह परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू करण्यात आले आहे. सोमवारी आ. डॉ. पंकज भोयर यांनी पीरबाबा दर्गाह परिसरातील विकास कामांना भेट देवून कामांचा आढावा घेतला.केळझर जवळून समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग जात आहे. त्यामुळे मध्य भारतातील हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पुढे प्रकाशझोतात येणार आहे. येथे हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गणपती मंदिर व बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेली धम्मभूमी तसेच हिंदु मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पीरबाबा दर्गाह हे तीनही क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.केळझर येथील हजरत पिरबाबा दर्गासाठी १ कोटी ४२ लाख रुपये, बौद्ध विहाराच्या विकासासाठी १ कोटी ३७ लाख तर प्रसिद्ध गणपती मंदिराच्या विकासासाठी १ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय केळझर गावात पर्यटन क्षेत्रासाठी लागणाºया पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात आहे. पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या गावाला भेट देत विकास कामांची माहिती घेतली होती. त्यानंतर येथील गावातील रस्ते कामांना वेग आला. पीरबाबा दर्गाह परिसरात रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्यालगत दोन्ही बाजूला नालीचे खोदकाम करण्यात येत आहे. तसेच दर्गाच्या प्रवेश द्वाराजवळ पाणी जमा होण्यासाठी एक छोटे टाकेही बांधले जात आहे. या कामाची पाहणी करीत आ. डॉ. भोयर यांनी दर्जाबाबत सुचना केल्या. यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष डॉ. इर्शाद शेख यांनी भोयर यांचे स्वागत केले. यावेळी जि.प. सदस्य विनोद लाखे, नवशाद शेख उपस्थित होते.मुख्यमंत्री दत्तक ग्राममुळे निधीची चणचण नाहीकेळझर गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. यामुळे गावांत विकास कामे जोरात सुरू आहेत. गावातील पाणी पुरवठ्यासह रस्ते, नाल्या चकाचक करण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीच्यावतीनेही कामे करताना कुठलीही कसर सोडली जात नाही. या गावात होत असलेल्या कामांना कुठलाही निधी कमी पडणार नाही याची दक्षता शासनाच्यावतीने घेण्यात येत असल्याचे दिसते.