शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

शेतातून बोरांची झाडे झाली हद्दपार... गावरान बोरं कशी खायला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 17:45 IST

गावरान बोरांचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते, अशी या गावरान बोरांची ख्याती प्राप्त आहे; पण काळाच्या ओघात ही बोरं लुप्त पावत चालली आहेत.

वर्धा : दिवाळीच्या काळात मिळणारी गावरान बोरं अलीकडे दिसेनाशी झाली आहेत. संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ व्यापली आहे. मात्र गावरान बोरांची मजा यात नाही.

गावरान बोरांचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते, अशी या गावरान बोरांची ख्याती प्राप्त आहे; पण काळाच्या ओघात ही बोरं लुप्त पावत चालली आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागासह शहरी भागातही फक्त गावरान पेवंदी व बारीक बोरच मिळत असे; पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या जाती निर्माण करण्यात आल्या खऱ्या पण यात गावरान बोरांची मजा बिल्कुलच नाही हे मात्र खरं.

पूर्वी बऱ्याच शेतात बोरं, आंबा,बाभूळ आदी झाडांचे बन मोठ्या प्रमाणात असायचे. शेतकऱ्यांकडून यांचे योग्य संगोपन केले जायचे; पण वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली गेली. यामध्ये गावरान बोरांचीही झाडे नष्ट करण्यात आली. तरी पण अनेक शेतकऱ्यांनी बोरांची झाडे जोपासली आहेत,यामुळे ग्रामीण भागात अजूनही गावरान बोरं चाखायला मिळतात,

१) *किलोला २५ रुपयांचा भाव*

एकेकाळी गावरान बोरांना काहीही किंमत नसायची मोठ्या प्रमाणात ही बोरं फेकली जायची. ग्रामीण भागातील मुलं बोरं गोळा करून ते वाळवत टाकून बोरकूट करायचे,पण आता तसे राहिले नाही.बोरांची झाडंही कमी झालीत आणि मुलंही व्यस्त झाली आहेत. यामुळे आज या बोरांचा भाव किलोला २५ रुपये झाला आहे,

२) यंदा ॲपल बोरही मिळेना

ही बोरं सफरचंदाच्या आकाराची असल्याने याला ॲपल बोर म्हटले जाते,याचे उत्पादन अधिकतर पंढरपूर भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते,पण यावर्षी परतीच्या पावसामुळे बोर पिकांचे मोठे नुकसान झाले, तसेच डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चही महागला यामुळे ॲपल बोर फार कमी प्रमाणात येईल.

३) शेतातून बोरांची झाडे गायब

माझ्या शेतात गावरान पेवंदी व बारीक बोरांची बरीच झाडे होती; पण दीर्घकालावधीमुळे ती जीर्ण झालीत व नष्ट झाली,तरी पण काही झाडे जोपासली आहेत, यामुळे आजही गावरान बोरं चाखायला मिळतात.

बाबा शेख, शेतकरी

वाढत्या लोकसंख्येमुळे ठिकठिकाणी घरं बांधण्यात आली व बरीच पडीक जमीन वाहितीखाली आली यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आणि आता शेतात जी झाडे आहेत त्यामुळे माकडांचा त्रास उभ्या पिकांना होत आहे. यामुळे झाडं तोडणे सुरू आहे. बोरींच्या झाडासह इतरही झाडे नष्ट होत आहेत तरीपण आंब्याच्या व बोरांच्या झाडांचे जतन केले जाते.

राजेंद्र होरे, शेतकरी

टॅग्स :agricultureशेतीenvironmentपर्यावरण