शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कृषी विभागाचा कापूस उत्पादनाचा अंदाज चुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यात १ लाख २६ हजार ६४१ शेतकऱ्यांचा २३ लाख १२ हजार ७८८.५८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर ३९ हजार ९०६ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ७ लाख २१ हजार ३०७.०९ क्विंटल कापूस कापूस पणन महासंघ, सीसीआय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींना विकल्याची नोंद कालपर्यंत घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देम्हणे, २५.६७ लाख क्विंटल उत्पादन होईल । खरेदी झाला ३०.३४ लाख क्विंटल कापूस

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अंदाजच चुकल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. इतकेच नव्हे तर या विषयावर कृषी तज्ज्ञांकडूनही दुजोरा दिला जात आहे. परिणामी, प्रत्यक्ष फिल्ड न करणाऱ्या आणि २५.६७ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचीच बदली करण्याची मागणी होत आहे.प्राप्त माहितीनुसार, सन २०१९-२० या हंगामात वर्धा जिल्ह्यात २५.६७ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता कागदी घोडे धावविणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून वर्तविण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्ष फिल्ड न करणाऱ्या कृषी विभागाचा हा अंदाज सुमारे ३० टक्क्यांनी चुकल्याचे सध्या दिसून येत आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यात १ लाख २६ हजार ६४१ शेतकऱ्यांचा २३ लाख १२ हजार ७८८.५८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर ३९ हजार ९०६ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ७ लाख २१ हजार ३०७.०९ क्विंटल कापूस कापूस पणन महासंघ, सीसीआय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींना विकल्याची नोंद कालपर्यंत घेण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ६६ हजार ५४७ शेतकऱ्यांनी ३० लाख ३४ हजार ९५.६७ क्विंटल कापूस विकला असून अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक असल्याचे वास्तव आहे. या संपूर्ण प्रकाराला केवळ कृषी विभागच दोषी असल्याचे बोलले जात आहे.२८ हजार ९१० शेतकºयांचा कापूस खरेदी होणे शिल्लककापूस खरेदीसाठी कापूस पणन महासंघाकडे ७ हजार १४४ तर सीसीआयकडे ४२ हजार ९९० शेतकऱ्यांनी २७ मे अखेरपर्यंत नोंदणी केली. त्यापैकी २८ हजार ९१० शेतकऱ्यांकडील कापूस अद्यापही खरेदी करण्यात आलेला नसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.पीक कापणी प्रयोगाच्या आधारे कुठल्या शेतमालाचे किती उत्पादन होईल याचा अंदोज कृषी विभाग वर्तवितो. वर्धा जिल्ह्यात कापूस उत्पादनाबाबतचा अंदाज नेमका कुठे चुकला याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना विचारल्या जाईल. शिवाय त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य कार्यावाही करण्यात येईल.- आर. जे. भोसले, सहा. कृषी संचालक, नागपूर विभाग, नागपूर.७५१ शेतकºयांनी केली दुबार नोंदणीसीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस देण्यासाठी एकूण ५० हजार ८८५ शेतकºयांनी नोंदणी केली होती. परंतु, मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी झाल्यावही शेतकºयांच्या घरी कापूस शिल्लक राहिल्याची बाब उजेडात आल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत नोंदणी करणाºया ५० हजार ८८५ शेतकºयांपैकी ७५१ शेतकºयांनी दुबार नोंदणी केल्याचे पुढे आले आहे. परिणामी या नोंदणीला चाळणी लावून ती वगळण्यात आली आहे. शिवाय सदर मोहीम सध्या युद्धपातळीवर राबविली जात असून मोहीम पूर्णत्वास गेल्यावर दुबार नोंदणी करण्याच्या प्रकाराला मोठी चाळणीच लागणार असल्याचे बोलले जात आहे.वर्धा जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत सन २०१९-२० या हंगामात नक्कीच २५ टक्क्यांनी कपाशीचा पेरा वाढला. परंतु, त्याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली. इतक्यावरच अधिकारी थांबले नाही तर त्यांनी कार्यालयात बसूनच कापूस उत्पादनाबाबतचा अंदाज वर्तविल्याचे कापूस खरेदीच्या आकडेवारीवरून दिसून येते. हा प्रकार निंदनिय आहे. त्यामुळे अशा दुर्लक्षीत धोरण अवलंबणाºया अधिकाºयांना शासनानेही समज देत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.- विजय जावंधिया, शेतकरी नेते.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस