शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

इम्युनिटी पॉवर वाढविणाऱ्या रोपांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 16:06 IST

फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. .

ठळक मुद्देतुळस रोपाला विशेष मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : गेल्या वर्षीपासून देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शिरकाव झाला, पण फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. यामध्ये विशेष करून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गिलोय (अमृता), पुदिना या वनस्पतीचा वापर करीत असल्याचे दिसून येते.  तसेच कडुनिंबाचा ही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. कडुनिंबाच्या सालीचा काढा, पाल्यांचा रस, नागरिक आवर्जून घेत आहेत, या रोपांचे गुणधर्म.

 तुळस

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्त असते. कफ, तसेच वातदोषाचे शमन करणारी पित्त वाढविणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो.

 अश्वगंधा

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटँड आणि अँटिइंफ्लेमेंटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधीत समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते.

आले (अद्रक)

अद्रकमध्ये अँटिफंगल, अँटिसेफ्टिक, अँटिबायोटिक, अँटिव्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेही आहेत, जे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक आहे. म्हणून आल्याचा उपयोग औषधी सामग्रीमध्येही केला जातो,

 गिलोय (अमृता)

गिलोय गुडुची आणि अमृता म्हणूनही ओळखले जातात, हे अँटिऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे, जे मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करते आणि पेशींना निरोगी आणि रोगांपासून दूर ठेवते. सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे आणि हे करण्यासाठी गिलोय हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

 पुदिना

आयुर्वेदानुसार पुदिना हा दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात आणि कफ दोषहारक व कृमीनाशक आहे, तसेच पुदिन्यामध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, तर ब जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते,

माझ्या नर्सरीला जवळपास २५ वर्षे झाले, विविध प्रकारच्या सहाशे वनस्पती तयार केल्या जातात. यामध्ये औषधी वनस्पतीवर विशेष भर दिला जातो, कोरोनाच्या काळात तुळस, ब्राह्मणी या रोपांची अधिक मागणी वाढली आहे,

चंद्रकांत पदीले दहेगाव (गावंडे) वर्धा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली, तसेच रोपांना जून, जुलै महिन्यात जास्त मागणी असते, तरीही काही प्रमाणात औषधी वनस्पतीला मागणी आहे, तुळस व गिलोय, अश्वगंधा या रोपांना बऱ्यापैकी मागणी आहे.

दिगंबर खांडरे हिंगणघाट.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस