शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इम्युनिटी पॉवर वाढविणाऱ्या रोपांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 16:06 IST

फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. .

ठळक मुद्देतुळस रोपाला विशेष मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : गेल्या वर्षीपासून देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शिरकाव झाला, पण फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. यामध्ये विशेष करून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गिलोय (अमृता), पुदिना या वनस्पतीचा वापर करीत असल्याचे दिसून येते.  तसेच कडुनिंबाचा ही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. कडुनिंबाच्या सालीचा काढा, पाल्यांचा रस, नागरिक आवर्जून घेत आहेत, या रोपांचे गुणधर्म.

 तुळस

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्त असते. कफ, तसेच वातदोषाचे शमन करणारी पित्त वाढविणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो.

 अश्वगंधा

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटँड आणि अँटिइंफ्लेमेंटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधीत समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते.

आले (अद्रक)

अद्रकमध्ये अँटिफंगल, अँटिसेफ्टिक, अँटिबायोटिक, अँटिव्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेही आहेत, जे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक आहे. म्हणून आल्याचा उपयोग औषधी सामग्रीमध्येही केला जातो,

 गिलोय (अमृता)

गिलोय गुडुची आणि अमृता म्हणूनही ओळखले जातात, हे अँटिऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे, जे मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करते आणि पेशींना निरोगी आणि रोगांपासून दूर ठेवते. सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे आणि हे करण्यासाठी गिलोय हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

 पुदिना

आयुर्वेदानुसार पुदिना हा दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात आणि कफ दोषहारक व कृमीनाशक आहे, तसेच पुदिन्यामध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, तर ब जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते,

माझ्या नर्सरीला जवळपास २५ वर्षे झाले, विविध प्रकारच्या सहाशे वनस्पती तयार केल्या जातात. यामध्ये औषधी वनस्पतीवर विशेष भर दिला जातो, कोरोनाच्या काळात तुळस, ब्राह्मणी या रोपांची अधिक मागणी वाढली आहे,

चंद्रकांत पदीले दहेगाव (गावंडे) वर्धा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली, तसेच रोपांना जून, जुलै महिन्यात जास्त मागणी असते, तरीही काही प्रमाणात औषधी वनस्पतीला मागणी आहे, तुळस व गिलोय, अश्वगंधा या रोपांना बऱ्यापैकी मागणी आहे.

दिगंबर खांडरे हिंगणघाट.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस