शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

पाण्याची टाकी बांधकामाच्या चौकशीची मागणी धूळ खात

By admin | Updated: November 13, 2015 02:10 IST

भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने २००७-०८ मध्ये ४० हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी...

पुलगाव : भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने २००७-०८ मध्ये ४० हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधकामास मंजुरी दिली. तत्कालिन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुमारे चार वर्षांपूर्वी २८ लाख ६० हजार ५०० रुपये खर्चून टाकीचे बांधकाम झाले; पण निकृष्ठ दर्जाच्या बांधकामामुळे टाकीतून पाणी गळते. यमुळे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी होत आहे. अद्याप चौकशी होत नसल्याने असंतोष पसरला आहे.२००१ च्या जणगणनेप्रमाणे कवठा (रे.) येथील लोकसंख्या २२८२ इतकी होती. २००९ मध्ये २३४० तर २०२४ मध्ये २४३५ होईल, असा अंदाज आहे. गावात सात विहिरी व सात हातपंप आहेत. यातील पाणी पातळी खालावत असल्याने ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांची गरज लक्षात घेत तेथे आठ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधण्यास मंजुरी देत शासनाने निधी उपलब्ध करून दिला. वर्धेच्या कंत्राटदारांनी चार वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण केले; पण निकृष्ठ बांधकामामुळे टाकीत पाणी राहात नाही. पाणी गळते, टाकी कधीही कोसळून अपघात होण्याची भीती आहे. यामुळे सध्या सदर टाकी शोभेची ठरत आहे. कवठा (झो.) येथील सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सतत कंत्राटदारावर कारवाईची मागणी करीत आहेत. ग्रा.पं. च्या सर्वसाधारण सभा, ग्रामसभा, आमसभेत ग्रामस्थांनी गैरप्रकाराची चौकशी व्हावी, या मागणीचा पाठपुरावा केला. एक वर्षापूवी खा. रामदास तडस, जि.प. सदस्य राना रणनवरे यांनी जाहीर सभेत गैरप्रकाराची १५ दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन दिले; पण अद्यापही चौकशीला सुरूवात झाली नसल्याचे दिसते. या सर्व बाबी ग्रा.पं. सरपंच व सचिवांच्या लक्षात असताना कंत्राटदाराची अंतिम देयके अदा करण्यात आली. यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहे. सतत पाठपुरावा करूनही चौकशी का होत नाही, देयक कसे देण्यात आले, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)