शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पावसाचे आगमन लांबले, बियाणे खरेदीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 08:00 IST

Wardha News अजूनही पावसाचे काहीच खरे नसल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीकरिता ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.

आनंद इंगोले

वर्धा : मृग नक्षत्र लागून आता आठ दिवसांचा कालावधी लोटला तरीही मान्सूनचा अद्याप पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अजूनही पावसाचे काहीच खरे नसल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीकरिता ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.

जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ३२ हजार ४४५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन असून सोयाबीनचे क्षेत्र दरवर्षीप्रमाणेच जास्त आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध व्हावी म्हणून मागणीही करण्यात आली. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी आणि मका या पिकांच्या ६३ हजार ३४७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असता जिल्ह्याला ६६ हजार ८४५ क्विंटल बियाणे उपल्बध झाले आहे. तर रासायनिक खतांचीही मागणीनुसार जिल्ह्याला उपलब्धता झाली आहे. १ लाख ०७ हजार ११५ मेट्रिक टन रासानिक खताची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ९१ हजार ७८३ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. परंतु अद्याप पावसाचे आगमनच झाले नसल्याने शेतकऱ्यांनीही बी-बियाणे व खते खरेदीला ब्रेक दिला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पावसाची तर कृषी केंद्र चालकांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.

बियाणे व रासायनिक खतांची आवश्यकतेनुसार जिल्ह्यात उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी केंद्रातूनच बियाणे, रासयनिक खते व कीटकनाशकांची खरेदी करावी. विशेषत: जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.

संजय बमनोटे, कृषी विकास अधिकारी, जि. प. वर्धा.

-----------------------------------

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस