शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील समर्पित नक्षलवादी वर्ध्यात घेत आहेत औद्योगिक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 19:10 IST

Wardha News नक्षल चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्यासाठी गडचिरोलीतील बारा जणांनी तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेऊन अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला शुक्रवारी भेट दिली.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमाला भेटजाणून घेतले बापूंचे रचनात्मक कार्य

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : नक्षल चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्यासाठी गडचिरोलीतील बारा जणांनी तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेऊन अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला शुक्रवारी भेट दिली. बापूंना अभिवादन करीत त्यांचे रचनात्मक कार्य, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जाणून घेतला. (Dedicated Naxalites in Gadchiroli are undergoing industrial training in Wardha)

गडचिरोली जिल्ह्यातील काही युवक युवतींनी नक्षल चळवळीने प्रभावित होऊन क्रांतिकारी विचार अंमलात आणण्यासाठी हातात बंदूक घेतली. मात्र, चळवळीत प्रत्यक्ष काम करीत असताना आपण भटकलो आहोत, याची त्यांना वेळीच जाणीव झाली आणि समर्पण केले. यातील कुणी पाच तर कुणी वीस वर्षे नक्षल चळवळीत काढलीत. गेल्या पाच ते एक वर्षात समर्पण केलेल्यांना वर्ध्यातील महात्मा गांधी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात तीन दिवस फिनाईल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यातून त्यांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करता येईल.

 

गडचिरोलीत पोलिसांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ या समर्पण केलेल्या व्यक्तींना मिळाला आहे. यातून त्यांचे पुनर्वसन झाले आहे. आज सामान्य नागरिकांसारखे जीवन जगत ते कुटुंबीयांसोबत गुण्यागोविंदाने राहात आहेत. तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. अंकित गोयल यांनी वर्ध्यातही पोलीस अधीक्षक म्हणून रचनात्मक कार्य केले. नवजीवन योजनेंतर्गत पांढरकवडा येथील पारधी बेड्यावरील नागरिकांना त्यांनी दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते, हे विशेष.

आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

समर्पित नक्षल्यांनी भेट दिली असता, संगीता चव्हाण यांनी आश्रमाविषयी माहिती दिली. आश्रमाचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू, मंत्री मुकुंद मस्के, सेवाग्राम पोलीस ठाण्याचे निरीक्षक कांचन पांडे, अयुब खान आणि विमल नयन तिवारी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले. प्रभू यांनी गांधीजींचा शांती व अहिंसेचा मार्ग दिशा देणारा असून, रचनात्मक कार्यातून आपण खूप काही शिकू शकतो, असे सांगितले. मस्के यांनी बरे-वाईट अनुभव खूप काही शिकवून जातात. आपण आपला मार्ग सोडता कामा नये, ही एक संधी मिळाली आहे. यातून जीवन घडवा, असा संदेश दिला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीSewagramसेवाग्राम