शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

पटवाऱ्याच्या प्रतापाने जिवंत महिला झाली मृत

By admin | Updated: December 9, 2014 22:54 IST

शासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीमुळे अनेक ठिकाणी मृत व्यक्ती जिवंत असल्याच्या नोंदी आहे. त्यांच्या नावे अनेक योजनांचा लाभ उचलल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र हिंगणघाट तालुक्यातील

गौरव देशमुख - वायगाव (नि.)शासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीमुळे अनेक ठिकाणी मृत व्यक्ती जिवंत असल्याच्या नोंदी आहे. त्यांच्या नावे अनेक योजनांचा लाभ उचलल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र हिंगणघाट तालुक्यातील सावली (सास्ताबात) येथील एका जिवंत महिलेला मृत दाखविण्याचा प्रताप गावच्या पटवाऱ्याने केला आहे. या महिलेचे नाव मेहरूम जयरूद्दीन शेख असे आहे. शासकीय कागदपत्रावर ती मृत असल्याने तिला शासनाच्या योजनेचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. गत सहा महिन्यांपासून या महिलेला निराधार योजनेतून मिळणारी पेन्शन बंद झाल्याने तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता तिला आता जिवंत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. हा पुरावा गोळा करण्याकरिता ती पटवाऱ्याकडे गेली असता पटवारी गावात येत नसल्याचे तिला सांगण्यात आले आहे. जिवंत राहण्याकरिता शासनाने दिलेल्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने वृद्धावस्थेत काय करावे असा प्रश्न तिच्या समोर उभा आहे. शिवाय ती जिवंत असताना तिला पटवाऱ्याने मृत घोषित करण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.