लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून या योजनेतील लाभार्थी शेतकºयांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहे. पहिल्या यादीत १६६ तर दुसऱ्या यादीमध्ये ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीतील आठ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक चुकीचे असून चार शेतकरी मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभाकरिता आधारच अडसर ठरताना दिसत आहे.शासनाने प्रायोगित तत्त्वावर कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करीत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या लोणी आणि कारंजा (घा.) तालुक्याच्या येणगाव अशा दोन गावातील १६६ शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. यापैकी १५४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून ८ शेतकºयांचे आधार क्रमांक चुकीचे आहेत. तर चार शेतकरी मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. या यादीतील ११२ शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ५ लाख ९४ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. आता आधार अपडेट करण्यासाठी शेतकऱ्यांची फरपट होत असल्याने त्यांना अद्याप कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकला नाही. या योजनेमध्ये जिल्ह्यात ६१ हजार ८४ शेतकरी पात्र असून त्यातील ५७ हजार ७३३ शेतकरी आधार धारक आहे. यापैकी ४६ हजार ५९० शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून दोन्ही यादीनंतर अद्याप ११ हजार १४३ शेतकरी प्रतिक्षेत असल्याची माहिती जिल्हा निबंधक कार्यालयाकडून मिळाली आहे. दुसºया यादीतील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाचा अडथळा कायमच आहे. काहींनी आधार क्रमांकात दुरुस्ती केल्यानंतरही योजनेच्या सर्व्हरवर दुरुस्ती आधार क्रमांक कोण अपलोड करेल, ही नवी अडचण निर्माण झाल्याने हे शेतकरी अद्याप कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहे.पहिल्या यादीतील आठ शेतकऱ्यांच्या बँक केवायसी व आधार क्रमांकामध्ये तफावत असल्याचे आधार प्रमाणिकरणादरम्यान समोर आले आहे. त्यांच्या आधारमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात आले पण, योजनेच्या सर्व्हरवर दुरुस्ती आधार क्रमांक कोण अपलोड करेल, याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरु आहे.- गौतम वालदे, जिल्हा निबंधक.नवीन कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत माझे वडील कवडू सपाट यांचे नाव आले आहे. योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण करताना त्यांच्या हाताचा अंगठा आवश्यक आहे. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने वारसदार चढवायला सांगितले. वारसदार चढवूनही अद्याप लाभ मिळाला नाही.- गणेश सपाट, शेतकरी रा. लोणी.माझ्याकडे तीन एकर शेती असून २०१८ मध्ये ८० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. सततची नापिकी असल्याने कर्जाची परतफे ड करता आली नाही. या कर्जमुक्ती योजनेत नाव आलं मात्र, आधारच्या घोळाने अद्यापही कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकला नाही.- रवींद्र कासार, शेतकरी, रा. लोणी.
कर्जमुक्तीत ‘आधार’ ठरतेय अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST
शासनाने प्रायोगित तत्त्वावर कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करीत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या लोणी आणि कारंजा (घा.) तालुक्याच्या येणगाव अशा दोन गावातील १६६ शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. यापैकी १५४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून ८ शेतकºयांचे आधार क्रमांक चुकीचे आहेत. तर चार शेतकरी मृत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कर्जमुक्तीत ‘आधार’ ठरतेय अडसर
ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे नवी अडचण : दुसऱ्या यादीत ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश