लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील हरणखुरी शिवारात पीक संरक्षणासाठी लावलेल्या प्रवाहित वीजतारेला स्पर्श होऊन शेतकरी पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.प्रज्वल नीलेश मसराम (१४) असे मृत शेतकरी पुत्राचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार हरणखुरी येथील शेतकरी रामचंद्र मुळे यांनी स्वत:च्या शेतात जगंली श्वापंदापासून पिकांच्या संरक्षणाकरिता शेताच्या धुऱ्यावर असलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता.सकाळी मृताचे वडील दीलेश मसराम शेतामध्ये माकडांना हाकलून लावण्यासाठी गेले. आणि घरी परतल्यावर मुलग प्रज्वलला शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी पाठविले. दरम्यान, बाजूच्या शेतकऱ्याने तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता. धुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडावर माकडे होती. त्यामुळे प्रवल त्या धुऱ्याजवळा गेला होता. मात्र त्याला धुऱ्यावर लावलेल्या वीज प्रवाहित तारांबाबत माहिती नसल्याने या वीजतारांचा स्पर्श होऊन प्रज्वलचा जागीच मृत्यू झाला. शेजारचे शेतकरी रामचंद्र मुळे हे शेतात गेले असता धुऱ्यावर प्रज्वलला मृतदेह त्यांना दिसून आला. आपल्यावर नाव येऊ नये म्हणून त्यांनी प्रज्वलचा मृतदेह आपल्या धुऱ्यावरून उचलून प्रज्वलच्या शेताच्या धुऱ्यावर देऊन ठेवला. या घटनेविषयीची माहिती लाईनमन महेश चतारे यांना माहिती दिली. त्यांच्यामार्फत प्रज्वलचा मृतदेह स्वत:च्या शेतात पडून असल्याची माहिती दिली. मृताच्या वडिलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळी प्रज्वलचा मृत्यू रामचंद्र मुळे यांच्या शेतात झाल्याचे निष्पन्न झाले.यावेळी पोलिसांनी धुºयावर लावलेला तार जप्त करून शेतकरी रामचंद्र मुळे यांना ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणात अधिक तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, उमेश हरणखेडे, राजू ठाकरे, करीत आहेत. घटनेची चौकशी करण्याची मागणी पित्याने केली आहे.
विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST
सकाळी मृताचे वडील दीलेश मसराम शेतामध्ये माकडांना हाकलून लावण्यासाठी गेले. आणि घरी परतल्यावर मुलग प्रज्वलला शेतात माकडांना हाकलून लावण्यासाठी पाठविले. दरम्यान, बाजूच्या शेतकऱ्याने तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडलेला होता. धुऱ्याच्या बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडावर माकडे होती. त्यामुळे प्रवल त्या धुऱ्याजवळा गेला होता. मात्र त्याला धुऱ्यावर लावलेल्या वीज प्रवाहित तारांबाबत माहिती नसल्याने या वीजतारांचा स्पर्श होऊन प्रज्वलचा जागीच मृत्यू झाला.
विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी पुत्राचा मृत्यू
ठळक मुद्देहरणखुरी शिवारातील घटना : शेतकऱ्याने बचावासाठी मृतदेह टाकला दुसऱ्या धुऱ्यावर