शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

त्या आठ वर्षीय वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

मृत वाघिणीचे तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून  शवविच्छेदनाचा अहवाल वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यात मृत वाघिण आठ वर्षांची असून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात आले. पांझरा गाेंडी (जंगल) परिसरात वाघिण मृतावस्थत पडून असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे ठाकूर, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव, बीट रक्षक डेहनकर, वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर यांनी घटनास्थळ गाठून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.

ठळक मुद्देवनविभागाला प्राप्त झाला वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ब्राह्मणवाडा बीटाचा एक भाग असलेल्या तुल्हाणा भागातील पांझरा (गोंडी) जंगल परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. या मृत वाघिणीचे तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून  शवविच्छेदनाचा अहवाल वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यात मृत वाघिण आठ वर्षांची असून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात आले.पांझरा गाेंडी (जंगल) परिसरात वाघिण मृतावस्थत पडून असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे ठाकूर, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव, बीट रक्षक डेहनकर, वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर यांनी घटनास्थळ गाठून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंधारे, डॉ. पाटील यांना पाचारण करण्यात आले. तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले होते. मृत वाघिण ही ४ ते ५ वयोगटातील असून क्षयरोगामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात होता.  तर शवविच्छेदन अहवालानंतरच वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार होते. या मृत वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल वनविभागाला प्राप्त झाला असून त्यात या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.मृतदेह होता बऱ्यापैकी कुजलेलामृत वाघिणीचे शवविच्छेदन करून तिच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढून या वाघिणीची शिकार झाली काय किंवा विषबाधेचा प्रकार तर नाही ना याबाबतची संपूर्ण शहानिशा केली होती. वाघिणीचा मृतदेह बऱ्यापैकी कुजलेला होता, त्यामुळे ही वाघिण नेमकी कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी वाघिणीची ओळख पटविण्यासाठी वनविभागाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहे. 

तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले होते. त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यात वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमुद आहे. असे असले तरी ही वाघिण नेमकी कुठली याबाबत माहिती घेतली जात आहे.- तुषार ढमढेरे,प्रभारी उपवनसंरक्षक, वर्धा.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू