शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

दिवसाही होतेय रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 9:47 PM

घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

ठळक मुद्देएका रॉयल्टीवर चार ट्रिपा : संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाय टेकोडाचे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी तक्रारही केली आहे.यंदा आष्टी तालुक्यात इस्माइलपूर या एकाच रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्याला लागून अमरावती जिल्ह्यातील जावरा रेतीघाट लिलाव झाला असून घाट सुरूही झाला आहे. बांधकामे झपाट्याने सुरू असल्याने रेतीघाट धारकांनी एक रॉयल्टी देत त्यावर चार वेळा रेतीची वाहतूक करण्याची अट घालण्यात आली आहे. प्रती ट्रीप ३ हजार ५०० रुपये दर आकारण्यात आले आहेत. परिणामी, रेतीची तस्करी बिनदिक्कत दिवसरात्र सुरू आहे. तहसील कार्यालयाचे काही अधिकारी व कर्मचारी यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. रेतीची चोरी पकडण्यासाठी भारसवाडा येथील तलाठ्याने सक्तीची रॉयल्टी तपासणी सुरू केली होती; पण या कर्तव्यदक्ष कर्मचाºयाला वरिष्ठ अधिकाºयांनी रॉयल्टी तपासू नका, घाटधारकावर मेहरबानी करा, असा उपटसुंभ सल्ला दिला आहे. यामुळे प्रशासन एवढे मेहरबान कसे, हा प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे.घाटातून रेती भरण्यासाठी सध्या मनुष्यबळाचा वापर होत आहे. दिवसभर १०० च्या वर ट्रॅक्टर, २५ डंपर यांच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जात आहे. शासनाने लिलावाचे दर ठरवून देण्यासोबतच एक ब्रास रेती कितीला विकायची, याचीही अट घालून दिली आहे; पण नियम धाब्यावर बसवून सर्रास लूट केली जात आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारून रातोरात अधिक लखपती बनण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. महसूल चोरी प्रकरणातील दंड आकारण्याचे प्रमाणही घटले आहे. रेतीचोरी पकडण्यासाठी पथक नेमण्याऐवजी त्याला अभय दिले जात असल्याचे दिसते. यामुळे गोदावरी, वाघोली, खडकी, टेकोडा येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतले आहेत. टेकोडा ग्रा.पं. चे उपसरपंच राजू कुरवाडे यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे.महसूल विभागाचे धाडसत्र कुठेही कार्यरत नाही. यामुळे चार तलाठी, दोन नायब तहसीलदार यांचे नेमलेले पथक गेले कुठे, असा प्रश्नही कुरवाडे यांनी उपस्थित केला आहे. उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. रेतीची दिवसाला होणारी सर्रास चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही उपसरपंच राजू कुरवाडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना देण्यात आल्या आहेत.अन्य घाटांमध्ये बोटींचा वापरघाटांतून रेतीचा उपसा करण्याकरिता यंत्रांचा वापर करू नये, असे नियम सांगतात; पण या नियमांना पदोपदी पायदळी तुडविण्याचे काम घाटधारक करीत असल्याचे दिसते. आष्टी तालुक्यात नसल्या तरी समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यात सर्रास बोटींचा वापर करून रेतीचा उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे. समुद्रपूर तालुक्यातील घाटातून तर मोठ्या प्रमाणात बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.